AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran: गरूड पुराणानुसार अशा लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, कायम होते अधोगती

. गरुड पुराणानुसार (Garud Puran) यामागील कारण मानवाचे काही कर्म आहेत. आयुष्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

Garud Puran: गरूड पुराणानुसार अशा लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, कायम होते अधोगती
गरूड पुराणImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 22, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई, मानवी जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. पैशामुळेच सर्व भाैतीक गरजा भागविणे शक्य आहे. पैसा कमविण्यासाठी अनेकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. माणूस त्यासाठी कठोर परिश्रम करतो, परंतु तरीही बऱ्याचदा त्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. गरुड पुराणानुसार (Garud Puran) यामागील कारण मानवाचे काही कर्म आहेत. आयुष्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे माणूस आर्थिक समस्येच्या गर्तेत अडकतो.

गरूड पुराणानूसार या चुका टाळाव्या

  1. तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरीही. भरपूर पैसे कमवा, पण कधीही कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. श्रीमंत लोक इतरांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात असे अनेकदा दिसून येते. गरुड पुराणानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. अशा लोकांवर माता लक्ष्मी नाराज होते आणि दूर जाते.
  2. गरुड पुराणानुसार जे लोकं पैशाचा लोभी असतात ते कधीही सुखी राहू शकत नाहीत. याउलट, जे इतरांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना कोणत्याही जन्मात समाधान मिळत नाही.
  3. गरुड पुराणानुसार इतरांची निंदा करणे किंवा टीका करणे हे पाप आहे. अशा स्थितीत माणसाने नेहमी आपल्या कामाशी संबंधित असले पाहिजे. असे लोक जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत.
  4. गरुड पुराणानुसार व्यक्तीने नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावे आणि घर स्वच्छ ठेवावे. अशा घरात मां लक्ष्मीचा वास असतो, जिथे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.
  5. दही आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण गरुड पुराणानुसार रात्री कधीही दही खाऊ नये. रात्री दह्याचे सेवन केल्याने आयुर्मान कमी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.