AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran: गरूड पुराणानुसार अशा लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, कायम होते अधोगती

. गरुड पुराणानुसार (Garud Puran) यामागील कारण मानवाचे काही कर्म आहेत. आयुष्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

Garud Puran: गरूड पुराणानुसार अशा लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, कायम होते अधोगती
गरूड पुराणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 22, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई, मानवी जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. पैशामुळेच सर्व भाैतीक गरजा भागविणे शक्य आहे. पैसा कमविण्यासाठी अनेकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. माणूस त्यासाठी कठोर परिश्रम करतो, परंतु तरीही बऱ्याचदा त्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. गरुड पुराणानुसार (Garud Puran) यामागील कारण मानवाचे काही कर्म आहेत. आयुष्यात त्यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे माणूस आर्थिक समस्येच्या गर्तेत अडकतो.

गरूड पुराणानूसार या चुका टाळाव्या

  1. तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरीही. भरपूर पैसे कमवा, पण कधीही कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. श्रीमंत लोक इतरांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात असे अनेकदा दिसून येते. गरुड पुराणानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. अशा लोकांवर माता लक्ष्मी नाराज होते आणि दूर जाते.
  2. गरुड पुराणानुसार जे लोकं पैशाचा लोभी असतात ते कधीही सुखी राहू शकत नाहीत. याउलट, जे इतरांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना कोणत्याही जन्मात समाधान मिळत नाही.
  3. गरुड पुराणानुसार इतरांची निंदा करणे किंवा टीका करणे हे पाप आहे. अशा स्थितीत माणसाने नेहमी आपल्या कामाशी संबंधित असले पाहिजे. असे लोक जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत.
  4. गरुड पुराणानुसार व्यक्तीने नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावे आणि घर स्वच्छ ठेवावे. अशा घरात मां लक्ष्मीचा वास असतो, जिथे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.
  5. दही आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण गरुड पुराणानुसार रात्री कधीही दही खाऊ नये. रात्री दह्याचे सेवन केल्याने आयुर्मान कमी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक