Garud Puran : मृत्यूनंतर का वाचले जाते गरूड पूराण? असे आहेत याचे नियम

| Updated on: Feb 28, 2024 | 4:25 PM

गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात एकूण 19 हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक मानवी जीवनाशी संबंधित आहेत. त्यात नरक, स्वर्ग, रहस्य, नीती, धर्म आणि ज्ञान यांचा उल्लेख आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने माणसाला ज्ञान, यज्ञ, तपश्चर्या आणि आत्मज्ञान आणि सद्गुण यांची माहिती मिळते.

Garud Puran : मृत्यूनंतर का वाचले जाते गरूड पूराण? असे आहेत याचे नियम
गरूड पूराण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : सनातन धर्मात अनेक महत्त्वाचे ग्रंथ आहेत, त्यापैकी गरुड पुराण (Garud Puran) हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. हे जगाचा निर्माता भगवान विष्णू यांनी त्यांच्या भक्तांना दिलेल्या ज्ञानावर आधारित आहे. या पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन केले आहे. याशिवाय गरुण पुराणात मानवाच्या वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळी शिक्षा सांगितली आहे. हे शास्त्र सामान्यतः कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर पाठ केले जाते. यामुळे आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि घर शुद्ध होते. आज आपण गरुड पुराणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गरुड पुराण कधी आणि का वाचावे?

शास्त्रानुसार घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठण करावे. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यासाठी गरुड पुराणाचे पठण केले जाते. मृत व्यक्तीचा आत्मा 13 दिवस घरात असतो. म्हणून गरुड पुराणाचे पठण केल्याने मोक्षप्राप्ती होते.

गरुड पुराण वाचण्याचे नियम

  • गरुड पुराण एक रहस्यमय ग्रंथ आहे. पाठ करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवा. याबाबत अनेक गैरसमज आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की या ग्रंथाचे पठण मृत्यूनंतर केले जाते. त्यामुळे ते घरी ठेवणे योग्य नाही.
  •  माणसाने गरुड पुराणाचे पठण पूर्ण शुद्ध मनाने करावे.
  • याशिवाय गरुड पुराणाचे पठण स्वच्छ ठिकाणीच करावे.

गरुड पुराणाचे महत्व

गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात एकूण 19 हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक मानवी जीवनाशी संबंधित आहेत. त्यात नरक, स्वर्ग, रहस्य, नीती, धर्म आणि ज्ञान यांचा उल्लेख आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने माणसाला ज्ञान, यज्ञ, तपश्चर्या आणि आत्मज्ञान आणि सद्गुण यांची माहिती मिळते. मान्यतेनुसार, एखाद्याच्या मृत्यूनंतर या गरूड पूराणाचे पठण केल्यास त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. याशिवाय घरातील वातावरण शुद्ध असते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)