Guru Gobind Singh Jayanti 2022 | जेव्हा 10 लाख सैनिकांवर 43 शीख भारी पडले होते, वाचा अंगावर काटे आणणारी इतिहासातील घटना

| Updated on: Jan 09, 2022 | 12:03 PM

मुंबई : भारताचा इतिहास अनेक घटनांनी बनलेला आहे. त्यातील अन्क गोष्टी आपल्याला प्रेरित करतात. त्यापैकी एक कथा म्हणजे चमकौरच्या युद्धाची कथा. 1704 मध्ये चमकौर येथे युद्ध झाले. या युद्धात गुरु गोविंद सिंग यांच्यासह ४३ शीखांनी मुघलांच्या दहा लाख सैनिकांचा पराभव केला. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू होते. त्यांनी खालसा पंथाची स्थापना […]

Guru Gobind Singh Jayanti 2022 | जेव्हा 10 लाख सैनिकांवर 43 शीख भारी पडले होते, वाचा अंगावर काटे आणणारी इतिहासातील घटना
Guru Gobind Singh Jayanti
Follow us on

मुंबई : भारताचा इतिहास अनेक घटनांनी बनलेला आहे. त्यातील अन्क गोष्टी आपल्याला प्रेरित करतात. त्यापैकी एक कथा म्हणजे चमकौरच्या युद्धाची कथा. 1704 मध्ये चमकौर येथे युद्ध झाले. या युद्धात गुरु गोविंद सिंग यांच्यासह ४३ शीखांनी मुघलांच्या दहा लाख सैनिकांचा पराभव केला. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू होते. त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली आणि आपले संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले.

गुरु गोविंद सिंग हे एक कुशल योद्धा होते. शत्रूशी मुकाबला करताना प्रथम साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब करावा आणि योग्य रणनीती आखल्यानंतरच युद्ध लढावे, अशी त्यांची धारणा होती. गुरु गोविंद सिंग यांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल. या निमित्ताने त्यांच्या शौर्याची गाथा जाणून घेऊयात.

मुघलांनी केलेल्या धर्मांतराला विरोध
१७०४ च्या सुमारास मुघलांची दडपशाही शिगेला पोहोचली होती. त्या काळी ते लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात गुंतले. त्यावेळी गुरू गोविंद सिंग यांनी याला विरोध करून मुघलांविरुद्ध उभे ठाकले. मुघल त्यांना पराभूत करण्यात अयशस्वी ठरले होते आणि त्यांना कोणत्याही किंमतीत मृत किंवा जिवंत पकडायचे होते. त्यामुळे त्यांनी आनंदपूर साहिबला वेढा घातला. आनंदपूर साहिबमध्ये अन्न पाणी शिल्लक राहीले नाही त्यांमुळे काही दिवसांनी गुरु गोविंद सिंग यांना यासाठी बाहेर पडावे लागणार आहे. पण गुरू गोविंद सिंग यांनी मुघलांच्या सैन्याला चकमा देत तेथील लोकांना घेऊन तेथून निघून गेले.

43 शीख मुघलांपासून सुटून चमकौरला पोहोचले
गुरु गोविंद सिंग आनंदपूर साहिबच्या लोकांसह सिरसा नदीवर पोहोचले. त्यावेळी नदीचे पात्र खूप थंड होते. अशा स्थितीत नदी ओलांडताना सर्व जण वाहून गेले. गुरु गोविंद सिंग यांचे फक्त दोन पुत्र आणि ४० शीख म्हणजेच ४३ लोक शिल्लक होते. ते दमले होते आणि सुरक्षित जागा शोधत होते. या दरम्यान ते चमकौरला पोहोचले आणि तेथे कच्छी हवेलीत गुरु गोविंद सिंग शिखांसोबत राहिले. जेव्हा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाला तेव्हा मुघल सैन्याने दहा लाख सैनिकांसह त्या कच्च्या हवेलीला वेढा घातला आणि गुरु गोविंद सिंग यांना शरण येण्यास सांगितले. मुघलांना खात्री होती की आता गुरू गोविंद सिंग इच्छा असूनही एवढ्या मोठ्या सैन्याचा पराभव करू शकत नाहीत. पण गुरुजींना मारणे मान्य होते, पण गुडघे टेकणे नाही.

गुरुजींनी अशा प्रकारे युद्धाची रणनीती बनवली
गुरू गोविंद सिंग यांनी आपल्या सर्व शीख साथीदारांना लढण्यासाठी तयार केले आणि त्यांना छोट्या गटात विभागले. मुघलांनी त्यांना आव्हान दिल्यावर गुरु गोविंद सिंग यांनी तलवारी, भाले आणि बाण घेऊन शिखांचा एक एक गट तिथे पाठवला. त्या शीखांनी मुघलांचा खंबीरपणे सामना केला आणि अर्ध्याहून अधिक सैन्याचा नाश केला. या दरम्यान सर्व शीख लढताना शहीद झाले. पण गुरु गोविंद सिंग आणि त्यांचे दोन साथीदार वाचले.

सैन्याचा ढीग करण्यात आला
यावेळी त्यांनी टॉर्च घेऊन उभ्या असलेल्या शत्रू सैन्याच्या सैनिकांना ठार केले. टॉर्च जमिनीवर पडल्या आणि विझल्या. सगळीकडे नुसता अंधार होता. अशा स्थितीत सैनिक आपापसात लढून मरण पावले. सकाळी वजीरखानाने हे दृश्य पाहिले तेव्हा सैन्य संपले होते आणि गुरु गोविंद सिंग तेथून पळून गेले होते.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा

तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की