अपयशाची भीती मनातून काढून टाका – आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.
कोणतंही सुरू केलेलं काम मध्येच अर्धवट सोडू नका. चुकांमधून शिकण्याची वृत्ती ठेवा. सकारत्मकतेमे पुढे चला. पुढे जाण्यासाठी अनेकदा तुम्हाला कठीण निर्णय घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे स्वत: परिस्थितीला सामोरं जायला तयार रहा. त्याचबरोबर दुसरी पर्याय ही कायम सोबत ठेवा.
ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.
चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.