Jyotish tips: साखरेशी संबंधित हे प्रभावी उपाय करा, पैशांची कमतरता कधीही भासणार नाही!

| Updated on: Mar 21, 2022 | 6:00 AM

कठोर परिश्रम आणि मेहनत असूनही, लोक त्यांच्या करिअरमध्ये ते स्थान मिळवू शकत नाहीत, ज्याच्या मागे ते धावत आहेत. एवढेच नाही तर त्यांना अनेकदा संघर्षाला (Struggle) सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की यामागे असे अनेक दोष असू शकतात, ज्याबद्दल व्यक्तीला अजिबात माहिती नसते. हे सर्व त्याच्यासोबत का होत आहे हे त्याला समजत नाही.

Jyotish tips: साखरेशी संबंधित हे प्रभावी उपाय करा, पैशांची कमतरता कधीही भासणार नाही!
साखरेशी संबंधित हे प्रभावी उपाय फायदेशीर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कठोर परिश्रम आणि मेहनत असूनही, लोक त्यांच्या करिअरमध्ये ते स्थान मिळवू शकत नाहीत, ज्याच्या मागे ते धावत आहेत. एवढेच नाही तर त्यांना अनेकदा संघर्षाला (Struggle) सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की यामागे असे अनेक दोष असू शकतात, ज्याबद्दल व्यक्तीला अजिबात माहिती नसते. हे सर्व त्याच्यासोबत का होत आहे हे त्याला समजत नाही. असे मानले जाते की असे दोष (Fault) दूर करण्यासाठी ज्योतिषीय उपाय  (Jyotish Shastra)  केले जाऊ शकतात. असे अनेक विशेष उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने दोष दूर होतात. ज्योतिष शास्त्रात वेगवेगळ्या समस्यांचे वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

ग्रह दोष दूर करा

असे मानले जाते की साखरेसाठी ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून ग्रह दोष दूर होतात. यासाठी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करावे लागेल. हा उपाय करण्यासाठी एका कलशात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात साखरेचे काही दाणे टाका. आता हे पाणी सकाळी लवकर सूर्यदेवाला अर्पण करा. या उपायाचा अवलंब केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि ग्रह दोष दूर होतात असे सांगितले जाते.

व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर

जर एखाद्याला व्यवसायात अडथळे येत असतील आणि तोटा होत असेल तर तो त्यावर साखर उपाय करू शकतो. अशा व्यक्तीने साखरेच्या पाण्याचे द्रावण नियमित घ्यावे. तांब्याचे भांडे घेऊन त्यात थोडी साखर टाकून रात्रभर ठेवा. सकाळी पूजा केल्यानंतर हा उपाय करावा. तसेच, जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल तर यावेळी तयार केलेले पाणी जरूर प्या. यातून यश मिळू शकते.

हा दोष दूर करणे आवश्यक

असे म्हटले जाते की जर घरात पितृ दोष असेल तर यामुळे केवळ आर्थिकच नाही तर शारीरिक समस्याही तुम्हाला घेरू शकतात. पितृदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये अनेकदा मतभेद होतात. साखरेशी संबंधित उपाय प्रभावी ठरू शकतात. हा उपाय करण्यासाठी पिठाची रोटी करून त्यात साखर मिसळून कावळ्यांना खाऊ घाला. असे म्हणतात की असे करणाऱ्या व्यक्तीला कमी त्रास होतो. हा उपाय अनेक दिवस करणे चांगले मानले जाते.

संबंधित बातम्या : 

Zodiac | ‘या’ दोन राशींच्या लोकांना या आठवड्यामध्ये करावी लागणार तारेवरची कसरत!

Basoda 2022 : जाणून घ्या शीतला अष्टमीचे महत्व आणि शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत!