AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी जातात, पहा प्रेमानंद महाराज काय सांगतात?

प्रेमानंद महाराज हे एक मोठे संत आहेत, त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी त्यांचे भक्त गर्दी करत असतात, सोप्या भाषेमध्ये आपल्या भक्तांना अध्यात्माचं महत्त्व समजून सांगणं हे प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनाचं वैशिष्ट आहे, प्रेमानंद महाराज म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या मृत्यूनंतर देखील आपल्या सोबोत येतात.

Premanand Maharaj : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी जातात, पहा प्रेमानंद महाराज काय सांगतात?
प्रेमानंद महाराज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 14, 2025 | 9:21 PM
Share

प्रेमानंद महाराज म्हणतात, या जगात फक्त तीनच अशा गोष्टी आहेत, ज्या मृत्यूनंतरही तुमच्यासोबत येतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पुण्य, दुसरी गोष्ट म्हणजे पाप आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामस्मरण. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुण्य केलंय, पाप केलंय, भगवताचं नामस्मरण केलंय तर या गोष्टी तुमच्यासोबत येणार. याच तीन गोष्टी पुढे चालून तुमच्या उद्धाराचं कारण बनतात. जर तुम्ही पुण्य केलं असेल तर तुम्हाला मोक्ष मिळतो, पाप केलं असेल तर मोक्ष मिळत नाही आणि हेच पुण्य तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणामधून मिळते, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. जर तुम्ही पाप केलं असेल तर तुम्हाला अनेक यातना होतील, तुमच्यावर अनेक संकट येतील, शरीर व्याधीग्रस्त बनेल, आणि जर तुम्ही पुण्य केलं असेल तर तुमचा लौकिक वाढेल, तुम्हाला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होईल, असंही त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये म्हटलं आहे.

प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात हे शरीर नश्वर आहे. जेव्हा तुमचा मृत्यू होतो, तेव्हा तुमचा आत्मा तुमच्या शरीराचा त्याग करतो. त्यानंतर तुम्ही जर पुण्य केलं असेल किंवा पाप केलं असेल तसा-तसा आणि त्या-त्या ठिकाणी आत्मा जन्म घेतो, आणि तसेच कर्म देखील त्याच्या वाट्याला येतात. त्यामुळे आपल्याला पुण्य कमवायचं आहे. आपल्याला पाप करायचं नाहीये, आणि हे पुण्य तुम्हाला देवाच्या नामस्मरणातून मिळणार आहे, त्यामुळे भगवंताचं नामस्मरण नित्य केलं पाहिजे, त्यातूनच तुमची प्रगती होईल.

भगवंताच्या नाम जपात एवढी ताकद आहे, की तुमच्याकडे कितीही पैसे असून तुम्हाला समाधान मिळणार नाही, मात्र तुम्ही जेव्हा देवाचा नाम जप करता तेव्हा तुम्हाला आत्मिक समाधान लाभतं. तुमची अध्यात्मिक प्रगती होते, असंही यावेळी प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये नाम जपाचं महत्त्व समजून सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.