शिवलिंगावर करू नये ‘या’ गोष्टी अर्पण; जाणून घ्या कारण

भगवान शंकर (Bhagwan shankar) यांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साद घालतात. महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावे प्रत्येकासाठीच शक्य आहे. त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले आहे. त्यांपैकी एक आहे रावण, रावण राक्षस असला […]

शिवलिंगावर करू नये 'या' गोष्टी अर्पण; जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 2:47 PM

भगवान शंकर (Bhagwan shankar) यांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साद घालतात. महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावे प्रत्येकासाठीच शक्य आहे. त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले आहे. त्यांपैकी एक आहे रावण, रावण राक्षस असला तरी तो शिव भक्त होता. भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून मनुष्य देखील अनेक प्रयत्न करतात. तसेच ते सोमवारी भगवान शिवची विधिवत पूजा देखील करतात. भगवान शंकराच्या पूजेमध्येही शिवलिंगाचे (Shivling) विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात,  परंतु अशा ही काही गोष्टी आहेत, ज्या भोले शंकरांना अप्रिय  आहेत, त्यामुळे अशा गोष्टी शंकराला कधीही अर्पण करू नयेत (things should not offer). जाणून घेऊया भगवान शंकराला काय अर्पण करू नये.

  1. हळद हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पण शिवलिंगावर हळद अर्पण करु नका. धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो. असे मानले जाते की, शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो.
  2. कुमकुम किंवा सिंदूर हिंदू धर्मात कुमकुम आणि सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुमकुम किंवा सिंदूर लावतात. तसेच काही लोक शिवलिंगाला सिंदूरही अर्पण करतात, परंतु शिव पुराणात असे म्हटले आहे की, शिवलिंगाला चूकूनही कुंकु लावू नका.
  3. तुळशी हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण केली जातात. मात्र शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण कधीही करु नका. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळसीच्या पतीचा वध केला होता. तेव्हापासून त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत.
  4. लाल आणि केतकीची फुले पूजेच्या वेळीही भोलेशंकरांना लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत. एके काळी भोलेशंकरांनी केतकीच्या फुलांना शाप दिला की, ते कधीही भगवान शंकराला पूजेत लाल फुले अर्पण करणार नाहीत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. नारळ पाणी नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळपाणी अर्पण करू नये. यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण स्वत:सोबत आणू नये.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.