AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan : दिवसाच होणार रात्र… काळाकुट्ट अंधार, त्या दिवशी काय होणार ? भारतावर परिणाम…

Longest Solar Eclipse 2027 : खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी 2027 हे वर्ष ऐतिहासिक ठरणार आहे. या वर्षी 2 ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण ही एक सामान्य घटना नव्हे; या शतकातील हे सर्वात मोठं सूर्यग्रहण असल्याचे म्हटलं जात आहे. सहा मिनिटांपेक्षा जास्त काळ सूर्य चंद्रामागे पूर्णपणे झाकला जाईल, ज्यामुळे दिवसा रात्रीसारखं दृश्य असेल.

Surya Grahan : दिवसाच होणार रात्र... काळाकुट्ट अंधार, त्या दिवशी काय होणार ? भारतावर परिणाम...
सूर्यग्रहण
| Updated on: May 06, 2026 | 12:55 PM
Share

Solar Eclipse : 2 ऑगस्ट 2027 ला लागणं सूर्यग्रहण हे खगोलशास्त्राच्या जगातील एक अतिशय खास घटना मानली जात आहे. या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील आणि काही क्षणांसाठी सूर्य पूर्णपणे झाकला जाईल. म्हणूनच हे 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण सूर्यग्रहणांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे, याचा कालावधी अंदाजे 6 मिनिटे आणि 23 सेकंद असण्याची शक्यता आहे, सर्वसाधारण ग्रहणांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त काळ आहे.

कधी, किती वेळ असेल सूर्यग्रहण ?

पंचांगानुसार, 2027 सालचं हे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट रोजी होणार असून, त्याचा एकूण कालावधी अंदाजे 6 मिनिटं आणि 23 सेकंद असेल. सामान्यतः खग्रास सूर्यग्रहण फक्त 2 ते 3 मिनिटं टिकते, परंतु हा वाढलेला कालावधी या शतकातील सर्वात मोठा मानला जात आहे.

कोणत्या देशात दिसणार ग्रहण ?

हे दुर्मिळ सूर्यग्रहण भारतात खंडग्रास स्वरूपात दिसेल, परंतु इजिप्त (लक्सर), सौदी अरेबिया (मक्का/जेद्दाह), येमेन, स्पेन, मोरोक्को आणि लिबियासह जगातील अनेक भागांमध्ये ते पूर्णपणे दिसेल. या भागांमध्ये दिवसा काही मिनिटांसाठी अंधार पडू शकतो, ज्यामुळे एक अनोखा अनुभव मिळेल. शास्त्रज्ञांनुसार, 1991 के 2114 दरम्यानचे हे सर्वात लांब खग्रास सूर्यग्रहण असेल. त्याचा दीर्घ कालावधी आणि ही एक दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना असल्यामुळे ते विशेष ठरतं. म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रप्रेमी या घटनेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सूर्य ग्रहण म्हणजे काय ?

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून, हे तेव्हा घडतं जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो आणि त्यामुळे सूर्यप्रकाश अंशतः किंवा पूर्णपणे झाकतो. जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जातो, तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात आणि जेव्हा फक्त मध्यभाग झाकला जातो व कडांभोवती प्रकाशाची एक वलय दिसते, तेव्हा त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

कशी घ्यावी काळजी ?

सूर्यग्रहण ही एक महत्त्वपूर्ण खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ते पाहताना व पाहिल्यानंतर काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, संरक्षणाशिवाय कधीही थेट सूर्याकडे पाहू नका, कारण त्याच्या तीव्र किरणांमुळे दृष्टीचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. तसंच, ग्रहणाच्या वेळी स्वयंपाक न करण्याची किंवा अन्न न खाण्याची परंपरा पाळली जाते, कारण असा मानलं जात की, या वेळी वातावरणातील जंतूंची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे अन्न दूषित होऊ शकतं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझरची टांगती तलवार?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझरची टांगती तलवार?.
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....