Vastu Tips : आर्थिक तंगीपासून पाहिजे असेल मुक्ती तर रोज करा हा हळदीचा उपाय

| Updated on: Apr 16, 2023 | 11:53 AM

पूजेच्या वेळीही हळदीचा तुकडा वापरला जातो. लग्नाच्या वेळीही वधू-वराला हळद लावली जाते, जेणेकरुन ते सर्व अडथळ्यांपासून त्यांचे रक्षण होईल.

Vastu Tips : आर्थिक तंगीपासून पाहिजे असेल मुक्ती तर रोज करा हा हळदीचा उपाय
हळदीचा उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आयुर्वेदात हळद (Haldi Upay) ही एक औषधी वनस्पती मानली जाते. हळदीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून बचाव होतो. त्याचबरोबर हळदीला धार्मिक कार्यातही विशेष स्थान आहे. पूजेच्या वेळीही हळदीचा तुकडा वापरला जातो. लग्नाच्या वेळीही वधू-वराला हळद लावली जाते, जेणेकरुन ते सर्व अडथळ्यांपासून त्यांचे रक्षण होईल. सनातन धर्मात हळदीला विशेष महत्त्व आहे. धनाची देवी माता लक्ष्मी, जगाचा रक्षक भगवान विष्णू आणि भगवान गणेशाला पिवळा रंग आवडतो. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रातही हळदीचा उल्लेख आहे. वास्तु तज्ज्ञांच्या मते हळदीमुळे घरातील वास्तू दोष दूर होतात. तुम्हीही आर्थिक संकट किंवा कौटुंबिक कलहामुळे त्रस्त असाल तर रोज हळदीचा उपाय करा.

ज्योतिषात हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. बृहस्पति यांना देवगुरु मानले जाते. एखाद्याच्या कुंडलीत जर बृहस्पति मजबूत स्थितीत असेल त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या स्वतःच निघून जातात. हळदीचे असे काही उपाय येथे जाणून घ्या जे आपल्या राशीतील बृहस्पति ग्रहाला बळकट बनविण्यासाठी उपयुक्त ठरतील.

हळदीचे हे उपाय अवश्य करा

  1.  दोन चिमूटभर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात, तसेच करिअरमध्येही यश मिळते.
  2. पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पति मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते.
  3. गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
  4. जर तुमच्या घरात वास्तू दोष असेल तर आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा. यामुळे वास्तुदोष दूर होतात.
  5.  जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वत:च्या कपाळावर लावा. हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात.
  6. जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनविली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करु शकत नाहीत.
  7. जर गुरु दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा. याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)