“ऐसे काम नहीं चलेगा…” Harbhajan Singh ने केएल राहुलच्या फॉर्मवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित

कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादव हा एकमेव खेळाडू सोडला, तर इतर कोणत्याही खेळाडूला अधिक धावा करता आलेल्या नाहीत.

ऐसे काम नहीं चलेगा... Harbhajan Singh ने केएल राहुलच्या फॉर्मवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित
हरभजन सिंग
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 31, 2022 | 9:59 AM

मेलबर्न : सुरुवातीचे दोन सामने टीम इंडियाने (Team India) आरामात जिंकले. परंतु कालचा आफ्रिकेविरुद्धचा (SA) सामना टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे पराभव झाला. तिसऱ्या मॅचमध्ये झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केएल राहुलच्या (KL Rahul) फॉर्मवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज केएल राहूल ज्यावेळी अधिक धावा बनवू शकला नाही. त्यावेळी त्याच्यावर चाहत्यांनी जोरदार टीका केली. आतापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचमध्ये त्याला मोठी खेळी करता आलेली नाही.

कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादव हा एकमेव खेळाडू सोडला, तर इतर कोणत्याही खेळाडूला अधिक धावा करता आलेल्या नाहीत. सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 133 पर्यंत पोहोचली. ज्यावेळी टीम इंडियाच्या 50 धावा झाल्या होत्या, त्यावेळी टीम इंडियाचे पाच फलंदाज बाद झाले होते.

मागच्या तीन मॅचमध्ये केएल राहूलने चांगली फलंदाजी न केल्यामुळे त्याच्या जागेवर ऋषभ पंतचा विचार करावा असं स्पष्ट केलं आहे. कारण आतापर्यंत ऋषभ पंतला विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना खेळता आलेला नाही.