AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Ajinkya Rahane साठी झटका, हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर, इतके महिने क्रिकेट नाही खेळता येणार

मागच्या आठवड्यात Ajinkya Rahane ने दुखापतीमुळे IPL 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.

IPL 2022: Ajinkya Rahane साठी झटका, हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर, इतके महिने क्रिकेट नाही खेळता येणार
ajinkya rahane Image Credit source: PTI
| Updated on: May 22, 2022 | 4:57 PM
Share

मुंबई: मागच्या आठवड्यात Ajinkya Rahane ने दुखापतीमुळे IPL 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर आहे. त्यामुळे पुढचे दोन महिने त्याला क्रिकेट खेळता येणार नाहीय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी (England Test Match) सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाच विचार होणार नाही. त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळण्याची शक्यताही तशी धुसरच होती. जून महिन्यात होणाऱ्या रणजी करंडकाच्या बाद फेरीच्या सामन्यातही तो खेळू शकणार नाही. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समितीला त्याच्याजागी नवीन खेळाडूची निवड करावी लागेल. स्कॅनमधून त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. अजिंक्य या आठवड्याच्या सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सच्या कॅम्पमधून बाहेर पडला. 14 मे रोजी पुण्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली होती.

या सीजनमध्ये रहाणेने किती धावा केल्या?

IPL 2022 च्या सीजनमध्ये अजिंक्य रहाणे विशेष काही करु शकला नाही. त्याने सात डावात फक्त 133 धावा केल्या. 19 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. केकेआरने त्याला बेस प्राइसला म्हणजे फक्त 1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून खराब फॉर्म

अजिंक्य रहाणे असाही फॉर्ममध्ये नव्हता. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत खराब कामगिरीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून डच्चू मिळाला होता. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये त्याला प्रभावी कामगिरी करण्याची संधी होती. दिनेश कार्तिकने ज्या प्रमाणे निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेतलं, तसाच चान्स अजिंक्य रहाणेकडेही होता. पण त्यात त्याला यश मिळालं नाही. दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होण्याआधीपासून अजिंक्य रहाणे सातत्याने खराब फॉर्मचा सामना करतोय.

केकेआर सहाव्या स्थानावर

यंदाच्या सीजनमध्ये केकेआरला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ते सहाव्या स्थानावर राहिले. प्लेऑफमध्ये त्यांना प्रवेश करता आला नाही. यंदाच्या सीजनमध्ये केकेआरचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होतं. 12 कोटीपेक्षा पणा जास्त रक्कम मोजून फ्रेंचायजीने त्याला विकत घेतलं होतं.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?