INDvsWI 2nd ODI: अक्षर पटेलने SIX मारुन मॅच संपवली, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा

INDvsWI 2nd ODI: भारताने काल सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत (IND vs WI) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 312 धावांच लक्ष्य दिलं होतं.

INDvsWI 2nd ODI: अक्षर पटेलने SIX मारुन मॅच संपवली, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा
IND vs WI
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 25, 2022 | 10:25 AM

मुंबई: भारताने काल सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत (IND vs WI) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 312 धावांच लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 विकेट आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. अक्षर पटेल (Axar Patel) भारताच्या विजयाचा नायक आहे. त्याच्या तुफान फलंदाजीमुळे भारताला हा विजय मिळवता आला. तत्पूर्वी करीयर मधील 100 वा वनडे सामना खेळणारा वेस्ट इंडिजचा सलामीवीर शाई होपने (Shai Hope) शानदार शतक झळकावलं. कॅप्टन निकोलस पूरनने 74 धावा बनवून त्याला चांगली साथ दिली. पण त्यांची ही खेळी वाया गेली. अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हर मध्ये षटकार ठोकून एमएस धोनीचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.

वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं

एकवेळ भारताची स्थिती 18 षटकानंतर 3 बाद 79 होती. त्यावेळी श्रेयस अय्यर (63) आणि संजू सॅमसनने (54) भारताचा डाव सावरला. दोघांनी आपआपली अर्धशतकं फटकावतानाच 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीपक हुड्डा (33) आणि अक्षरने झटपट 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने तुफान फटकेबाजी केली. त्याने 35 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते. आवेश खानने देखील दोन चौकार लगावले. त्यामुळे अखेरच्या 3 चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. अक्षर पटेलने त्यानंतर कायली मेयर्सने टाकलेल्या चौथ्या लो फुल टॉस चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं. भारताने दुसऱ्यासामन्यासह मालिकाही खिशात घातली.

दोन्ही सामान्यात रोमांचक विजय

भारतीय क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने रोमांचकारी पद्धतीनं जिंकले आहेत.वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चौकार मारता न आल्याने भारताने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मालिकेतील पहिला वनडे सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. त्याचवेळी भारताने 50 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारून दुसरा एकदिवसीय सामना जिंकला.अशा प्रकारे भारताने दोन्ही सामने रोमांचकारी पद्धतीने जिंकले.