AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL Asia Cup Final 2023 : भारत-श्रीलंका फायनल पावसाने रद्द झाली तर पाहा कोणाला करणार विजयी घोषित!

IND vs SL Final Asia Cup 2023 : आतापर्यंत भारतीय संघाने सातवेळा तर श्रीलका संघाने सहावेळा आशिया कपची फायनल फेरी गाठली आहे. या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं  संकट असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजयी संघ कोणता हे कसं ठरवणार? 

IND vs SL Asia Cup Final 2023 : भारत-श्रीलंका फायनल पावसाने रद्द झाली तर पाहा कोणाला करणार विजयी घोषित!
| Updated on: Sep 16, 2023 | 12:15 PM
Share

मुंबई : आशिय कप 2023 मधील सुपर 4 फेरीमधील सामने झाले असून शेवटच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता आशिया कपच्या फायनलमध्ये आता भारत-श्रीलंका एकमेकांना भिडणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघाने सातवेळा तर श्रीलका संघाने सहावेळा आशिया कपची फायनल फेरी गाठली आहे. या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं  संकट असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजयी संघ कोणता हे कसं ठरवणार?

सामना रद्द झाला तर…

भारत-श्रीलंका सामन्यामध्ये पावसाने खोडा घातला आणि रविवारी जर सामना नाही झाला तर फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे.  भारत-श्रीलंका सामन्यामध्ये पावसाने खोडा घातला आणि रविवारी जर सामना नाही झाला तर फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. 17 सप्टेंबरला हा सामना होणार असून त्या दिवशी पावसाने हजेरी लावली तर सामन्यासाठी राखीव दिवस 18 सप्टेंबर ठेवला आहे.

राखीव दिवशीही पाऊस आला तर…

सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे त्या दिवशीसुद्धा पावसाने हजेरी लावली तर फायनल विजेता कोण असणार? 18  सप्टेंबरलाही जर पाऊस आला आणि सामना नाही झाला तर दोन्ही संघांना विजेतेपद देण्यात येतं. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघाना आशिया कप 2023 चं विजेतेपद दोघांमध्ये वाटून देण्यात येणार आहे. याआधीही भारत आणि श्रीलंकेमध्ये अशा प्रकारे विजेतेपद दिलं आहे.

दरम्यान, 2002 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका संघाने प्रवेश मिळवला होता. त्यावेळी पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता आणि भारत आणि श्रीलंका यांनी विजेतेपद शेअर केलं होतं. रविवारी 90% टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सोमवारी म्हणजेच 18 सप्टेंबरला 69 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.