IND vs SA: चहलच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, दिग्गज गोलंदाजाने सांगितलं 3 षटकात कशी पलटवली बाजी

| Updated on: Jun 15, 2022 | 6:10 PM

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या दोन सामन्यात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आपल्या गोलंदाजीने प्रभावित करु शकला नव्हता.

IND vs SA: चहलच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, दिग्गज गोलंदाजाने सांगितलं 3 षटकात कशी पलटवली बाजी
Yuzi Chahal
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या दोन सामन्यात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आपल्या गोलंदाजीने प्रभावित करु शकला नव्हता. त्याला विकेटही काढता आल्या नव्हत्या आणि धाव गतीलाही लगाम घालता आला नव्हता. या दोन सामन्यातील कसर चहलने विशाखापट्टनमच्या सामन्यात भरुन काढली. चहलने तिसऱ्या टी 20 सामन्यात (3rd 20 Match) आपल्या चार षटकात पाचच्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली. त्याने 20 धावात तीन विकेट काढल्या व टीम इंडियाला सीरीजमधील पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या शानदार प्रदर्शनासाठी त्याची प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

आशिष नेहरा म्हणाला…

चहलची गोलंदाजी पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहरा म्हणाला की, “आज चहलची आक्रमकता पहायला मिळाली, ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. त्याने आज आपली लेंथ आणि पेसचं खूप चांगल्या पद्धतीने मिश्रण केलं. मागच्या सामन्यानंतर चहलने नक्कीच विचार केला असेल, तो डिफेन्सिव होता. त्याने आपल्या फ्लाइट चेंडूनी फलंदाजांना सतावल व फसवलं. आपल्या पहिल्या तीन षटकातच त्याने विजय दक्षिण आफ्रिकेपासून दूर नेलं”

मॅच विनर्सनाच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं

युजवेंद्र चहलने 20 धावा देऊन तीन विकेट काढल्या, ज्याने विजयाचा पाया रचला. चहलने सर्वाताआधी ऑलराऊंडर ड्वेन प्रिटोरियसला आऊट केलं. त्याने फक्त 20 धावा केल्या. त्यानंतर दिल्ली सामन्यातील हिरो रासी वॅन डार डुसेला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर त्याने मागच्या सामन्यात तुफानी फलंदाजी करणाऱ्या हेनरिक क्लासनला (29) आऊट केलं.

पहिल्या दोन सामन्यात जलवा दिसला नाही

याआधी खेळलेल्या गेलेल्या दोन सामन्यात चहलने निराशाजनक प्रदर्शन केलं होतं. त्याच्या गोलंदाजीत ते कौशल्य दिसलं नव्हतं, ज्याच्यासाठी चहल ओळखला जातो. पहिल्या सामन्यात त्याला पूर्ण चार षटकही गोलंदाजी करता आली नाही. त्याने 2.1 षटकात 26 धावा दिल्या होत्या. कटक मध्ये त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला. पण तो महागडा ठरला होता. त्याने चार ओव्हर्समध्ये 49 धावा दिल्या पण एकही विकेट काढली नाही.