AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Tushar Deshpande | ‘रोहित शर्मा याला आऊट करणं एकदम सोपं, विराट एबीसारखं नाही’, ‘त्या’ विधानावर तुषार देशपांडेने सोडलं मौन!

सामन्यानंतर तुषार देशपांडेचं कथित वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं होतं. मात्र त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी त्याला फैलावर घेतलं. अशातच यावर तुषारने इन्स्टा स्टोरी ठेवत स्पष्टीकरण दिलं आहे. 

IPL 2023 : Tushar Deshpande | 'रोहित शर्मा याला आऊट करणं एकदम सोपं, विराट एबीसारखं नाही', 'त्या' विधानावर तुषार देशपांडेने सोडलं मौन!
| Updated on: Apr 10, 2023 | 7:11 PM
Share

मुंबई :  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधील झालेला सामना एकतर्फी झालेला पाहायला मिळाला. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने सात विकेट्स ने मुंबईवर विजय मिळवला होता. या सामन्यात मुंबईची फलंदाजी ढेपाळलेली दिसली. चेन्नईचा बॉलर तुषार देशपांडे याने कर्णधार रोहित शर्माला बोल्ड केलं होतं, त्याचा खतरनाक आउट स्विंग समजण्यात रोहित पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. मात्र या सामन्यानंतर तुषार देशपांडेचं कथित वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं होतं. मात्र त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी त्याला फैलावर घेतलं. अशातच यावर तुषारने इन्स्टा स्टोरी ठेवत स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमंक कोणतं वक्तव्य होतं?

रोहित शर्माला आऊट करणं सोपं आहे. तितकं विराट कोहली आणि एबी डिव्हिलयर्स यांना नाही, अशा  प्रकाराचं वक्तव्य तुषार देशपांडे याने केल्याचे कोट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र यावर आता तुषारने मौन सोडलं असून स्टोरीमध्ये स्क्रीन शॉट शेअर करत फेक न्यूज असल्याचं त्याने सांगितलं आहे.

काय म्हणाला तुषार देशपांडे?

मला सर्व दिग्गज खेळाडूंचा आदर असून मी अशा प्रकराचं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं तुषारने म्हटलं आहे. मात्र यावरून तुषारला सोशल मीडियावर रोहितच्या चाहत्यांनी भरपूर प्रमाणात ट्रोल केलं. युवा खेळाडूसाठी ही चांगली गोष्ट नाही. तुषारने हाय व्होल्टेज सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार असलेल्या रोहितला बाद करत सुरूंग लावला होता.

Tushar Deshpande

मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या होत्या. मुंबईकडून 32 धावांची सर्वाधिक खेळी ईशान किशन यांनी केली होती. तर शेवटला ऋतिकने 18 धावांची खेळी करत संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला होता. मुंबईने दिलेलं आव्हान चेन्नईने 19 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलं. अजिंक्य रहाणेने केल्या 61 धावांच्या स्फोट खेळीच्या जोरावर चेन्नईने हा सामना जिंकला. त्यासोबतच ऋतुराज गायकवाड यांने नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.