AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: कॅप्टन रोहित ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला?

India vs Bangladesh 1st Test : भारतीय क्रिकेट संघाने शेजारी बांगलादेशला चौथ्याच दिवशी लोळवत 280 धावांनी शानदार विजय नोंदवला. कॅप्टन रोहित शर्माने या विजयाचं श्रेय देताना काय म्हटलं? जाणून घ्या.

IND vs BAN: कॅप्टन रोहित ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला?
rohit shamra ind vs ban 1st test post match presentation
| Updated on: Sep 22, 2024 | 4:52 PM
Share

टीम इंडियाने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी सहज विजय मिळवला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडिया या सामन्यात काही ठिकाणी अडचणीत सापडली होती. मात्र निर्णायक क्षणी भारतीय खेळाडूंनी परिस्थितीत सांभाळली आणि बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं. पहिल्या डावात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि ऋषभ पंत या दोघांनी शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात आर अश्विन याने 6 विकेट्स घेत सहज विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात. सामना कुठेही असोत, एक भक्कम संघ बनवण्याचं लक्ष्य असल्याचं रोहितने म्हटलंय.

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 3 वेगवान गोलंदाजांना संधी दिली. भारतातील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असतात. मात्र बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात स्थिती अशी नव्हती पेसर्सना खेळपट्टीतून मदत मिळत होती. रोहितने याबाबतही आपलं मत मांडलं.

रोहित काय म्हणाला?

“परिस्थितीत काहीही असोत, आम्ही घरात (भारतात) खेळो अथवा परदेशात, आम्ही आमचा बॉलिंग अटॅक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही गेल्या काही वर्षात जिथेही खेळलोत, तेथील परिस्थितीनुसार आम्ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरलोय. तुम्हाला खेळाडूंना श्रेय द्यावं लागेल. गोलंदाजांना जेव्हा जबाबदारी दिली, तेव्हा त्यांनी अंग काढलं नाही. गोलंदाज पुढे येऊन जबाबदारी घेऊ इच्छितात”, असं रोहितने म्हटलं.

भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीत जानेवारीपर्यंत आणखी 9 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 4 सामने जिंकल्यास रोहितसेना सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचेल. अशात भारतीय कर्णधाराने चेन्नईतील विजयानंतर आनंद व्यक्त केला.

“आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर आमच्यासाठी हा निकाल हा शानदार आहे. आम्ही फार वेळानंतर कसोटी सामना खेळलोय. आम्ही इथे(चेन्नई) आठवड्याआधी आणि चांगली तयारी केली. आम्हाला तोच निकाल मिळाला, ज्याची आम्हाला प्रतिक्षा होती”, असंही रोहितने नमूद केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.