AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 T20 सामन्यात 204 धावा फटकावल्यानंतर कप्तान श्रेयस अय्यरचं KKR च्या फॅन्सना वचन, म्हणाला…

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची नजर आता आयपीएल 2022 च्या चषकावर आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सशी झालेल्या एका खास संभाषणात म्हणाला, "आयपीएल 2022 जिंकण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन."

3 T20 सामन्यात 204 धावा फटकावल्यानंतर कप्तान श्रेयस अय्यरचं KKR च्या फॅन्सना वचन, म्हणाला...
Shreyas Iyer - KKRImage Credit source: KKR INSTAGRAM
| Updated on: Feb 28, 2022 | 11:14 PM
Share

मुंबई : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने सलग तीन अर्धशतक झळकवली. श्रेयसच्या या कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. खरंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनही T-20 वर्ल्डकपसाठी संघ निवड करताना अशा प्रकारच्या डोकेदुखीमुळे आनंदी असेल. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला. आक्रमकतेबरोबरच परिस्थिती ओळखून खेळण्याचं भानही श्रेयसच्या फलंदाजीत दिसून आलं. विराटच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, त्याचा श्रेयसने पुरेपूर फायदा उचलला. दरम्यान, श्रेयसला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची नजर आता आयपीएल 2022 च्या चषकावर आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सशी झालेल्या एका खास संभाषणात म्हणाला, “आयपीएल 2022 जिंकण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन.” कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 16 फेब्रुवारीला श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले होते. श्रेयस अय्यरला लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 12.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. कोलकात्याने या खेळाडूची केलेली निवड श्रेयसने नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेत सार्थ ठरवली. हा खेळाडू अप्रतिम फॉर्ममध्ये आहे तसेच त्याच्या कर्णधारपदाची चुणूक सर्वांनी याआधीच पाहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या गेल्या दोन वर्षांमधील यशात अय्यरचा मोठा वाटा आहे.

श्रेयस अय्यर केकेआरशी झालेल्या संवादादरम्यान म्हणाला, “मी मैदानात उतरायला तयार आहे. यावेळी मी केकेआरकडून खेळणार आहे. जेव्हाही मी या संघाविरुद्ध खेळलो तेव्हा चाहत्यांचं या संघावर किती प्रेम आहे ते मी पाहिलं आहे. यावेळी मी या संघाचा कर्णधार असेन आणि स्टेडियम आमचा उत्साह वाढवेल. मी जबाबदारीसाठी तयार आहे आणि मला चॅम्पियनशिप जिंकायची आहे.”

केकेआरमधील वातावरण बदलेन : अय्यर

श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाबाबत खास गोष्ट सांगितली. अय्यर म्हणाला, “मी खेळाडूंचा कर्णधार आहे. सर्व खेळाडू एकाच ध्येयाचा विचार करतील असे वातावरण मला निर्माण करायचे आहे. मी केकेआरमध्ये वेगळ्या मानसिकतेसह येत आहे कारण आता माझ्याकडे अधिक अनुभव आहे आणि माझ्याकडे पूर्वीपेक्षा चांगले नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याचे कौशल्य आहे. अय्यर म्हणाला की केकेआरने मला विकत घेतल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्या दिवशी लिलाव पाहत होतो. केकेआर फ्रँचायझी सुरुवातीपासूनच मला विकत घेण्यासाठी पुढे होती. आम्ही सर्व खेळाडू एकत्र बसून लिलाव पाहत होतो. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. केकेआरने मला विकत घेतल्याचा मला आनंद आहे.”

इतर बातम्या

IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO

Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.