
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 20 संघ सहभागी झाले. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं. साखळी फेरीत प्रत्येक संघाने गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 1 असे एकूण 4 सामने खेळले. त्यानंतर प्रत्येक गटातून 2 अव्वल संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. तर इतर 12 संघांचं आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर सुपर 8 फेरीचा थरार रंगला. रविवारी 1 मार्च रोजी टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर करो या मरो अशा सामन्यात विजय मिळवला. यासह सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचली.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचताच उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं झालं आहे. टीम इंडियाआधी, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलसाठी पात्र ठरलेत. न्यूझीलंडचा अपवाद वगळता इतर 3 संघांची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली आहे. आता फायनलमध्ये पोहचणारे 2 संघ कोण असणार? हे सेमी फायनलच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने सेमी फायनलबाबत जाणून घेऊयात.
सेमी फायनलमधील दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या आणि यजमान टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा हा या 10 पर्वातील दुसरा सामना असणार आहे. टीम इंडियाने याआधी साखळी फेरीत वानखेडे स्टेडिममध्ये यूएसएला पराभूत केलं होतं.
टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंडची सेमी फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही सलग तिसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 2024 आणि 2022 साली सेमी फायनलमध्ये भिडले होते. इंग्लंडने भारताचा 2022 मध्ये 10 विकेट्सने धुव्वा उडवला होता. तर टीम इंडियाने 2024 मध्ये इंग्लंडला लोळवून 2022 च्या पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. अशात आता यंदा दोघांपैकी कोणता संघ ही आकडेवारी 2-1 अशी करुन सेमी फायनलचं तिकीट मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनलसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना 4 मार्चला कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे.