AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Syed Abid Ali Death : दिग्गज ऑलराउंडर सय्यद आबिद अली यांचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

Syed Abid Ali Cricket Career : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सय्यद आबिद अली यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं. दिग्गज ऑलराउंडरने क्रिकेट कारकीर्दीत 416 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 13 शतकंही झळकावली होती.

Syed Abid Ali Death : दिग्गज ऑलराउंडर सय्यद आबिद अली यांचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
Syed Abid AliImage Credit source: Dennis Oulds/Central Press/Hulton Archive/Getty Images
| Updated on: Mar 12, 2025 | 7:31 PM
Share

क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे माजी आणि दिग्गज खेळाडू सय्यद आबिद अली यांचं निधन झालं आहे. सय्यद आबिद अली यांनी 12 मार्चला जगाचा निरोप घेतला. ते 83 वर्षांचे होते. अली हे भारतयी संघात ऑलराउंडर म्हणून खेळायचे. अली यांची ऑलराउंडर या शब्दाला साजेशी अशी कामगिरी केली. अली यांनी त्यांच्या कारकीर्दीत 416 विकेट्स घेतल्या. तसेच 13 शतकंही झळकावली. तसेच अली हे त्यांच्या फील्डिंगसाठीही ओळखले जायचे. अली यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी अली यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

सुनील गावसकर काय म्हणाले?

ही फार वाईट बातमी आहे. ते मोठ्या मनाचे क्रिकेटर होते. अली टीमच्या गरजेनुसार सर्वकाही करायचे. अली यांनी निर्णायक क्षणी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग केली. तसेच लेग साईड कॉर्डन येथे अविश्वसनीय अशा कॅचही घेतल्या. ज्यामुळे आमचा स्पिन अटॅक आणखी मजबूत होता”, असं गावसकर म्हणाले.

पदार्पणातच धमाका

आबिद अली यांचा जन्म 9 सप्टेंबर 1941 रोजी हैदराबादमध्ये झाला. अली यांची वयाच्या 15 व्या वर्षी शाळेकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली. अली यांनी फिल्डिंगने प्रभावित केलं. त्यामुळे निवड समितीने अली यांची निवड केली. अली यांची शालेय स्तरावर 3 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर हैदराबाद ज्युनिअर टीममध्ये निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी अली यांची रणजी ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली. अली यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.

अली यांनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात धडक दिली. अली यांनी 1967 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अली यांनी पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावांत 33 धावा केल्या. तसेच 55 धावा देत 6 विकेट्सही घेतल्या.

आबिद अली यांची कारकीर्द

आबिद अली यांनी 29 कसोटी सामन्यांमध्ये 20.36 च्या सरासरीने 1 हजार 18 धावा केल्या. अली यांनी या दरम्यान 6 अर्धशतकं झळकावलं. तसेच 42.12 च्या सरासरीने 47 विकेट्सही घेतल्या. तसेच अली यांनी 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 धावा करण्यासह 7 विकेट्सही घेतल्या.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?