England Tour India | टीम इंडिया इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

England Tour India | टीम इंडिया इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 7:48 PM

मुंबई : इंग्लंडचा संघ अवघ्या काही दिवसांनी टीम इंडियाच्या दौऱ्यावर ( England Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरुद्ध कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. टीम इंडिया ही कसोटी मालिका जिंकेल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटु ब्रॅड हॉगने (Brad Hogg) केली आहे.  (Team India to win Test series against England predicts former Australia spinner Brad Hogg)

हॉग काय म्हणाला?

टीम इंडिया ही मालिका 3-1 किंवा 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, असं हॉग म्हणाला. हॉग त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलत होता. यावेळेस त्याने या मालिकेबाबत भविष्यवाणी केली. टीम इंडिया चेन्नईमधील पहिल्या 2 कसोटीत विजय मिळवेल. इंग्लंड तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत सामना जिंकेल. पण चौथ्या सामन्यात भारत विजयासह मालिकाही जिंकेल, असंही हॉगने म्हटलं.  तसेच हॉगने यावेळेस कर्णधार विराट कोहलीची पाठराखण केली.

गेल्या काही दिवसांपासून विराटऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. पण विराटच कर्णधार रहायला हवा, असं म्हणत हॉगने विराटची पाठराखण केली आहे. “विराट फार चांगला फलंदाज आहे. तो चांगली बॅटिंग करतो. विराटला कर्णधारपदावरुन हटवलं तर त्याचा टीम इंडियाच्या परंपरेवर आणि विराटवरही परिणाम होईल”, अशी भिती हॉगने व्यक्त केली.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईत खेळण्यात येणार आहेत. तर त्यानंतरचे 2 सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. हा तिसरा सामना (Day-night)असणार आहे. दरम्यान पहिल्या 2 कसोटींसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

टेस्ट सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

Rishabh Pant | “रिषभ पंत मॅचविनर खेळाडू, त्याला वनडे आणि टी 20 मध्ये संधी द्यायला हवी”

स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ व्हायरल

(Team India to win Test series against England predicts former Australia spinner Brad Hogg)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.