AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS ENG, Virat Kohali : काय तो अपमान! नवशिक्या गोलंदाजाच्या चेंडूवर आऊट होण्याची वेळ, चाहते भडकले

विराट कोहलीनं सामान्य चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या वरच्या काठानं बॅकवर्ड पॉईंटवर पोहोचला जिथं तयार डेव्हिड मलाननं कॅच करून विराटचा डाव संपवला. विराटला 3 चेंडूत केवळ एक धाव करता आली.

IND VS ENG, Virat Kohali : काय तो अपमान! नवशिक्या गोलंदाजाच्या चेंडूवर आऊट होण्याची वेळ, चाहते भडकले
विराट कोहलीImage Credit source: social
| Updated on: Jul 09, 2022 | 9:22 PM
Share

नवी दिल्ली : चाहत्यांना माजी कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohali) खूप आशा होत्या. 5 महिन्यांनंतर तो टी-20 (T20) इंटरनॅशनल खेळण्यासाठी मैदानात आला. पण, तो जात नाही ही वाईट वेळ आहे. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध तो अवघ्या 1 धावांवर बाद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला एका अशा खेळाडूनं बाद केलं तो खेळाडू साधा चर्चेतही नाही. रिचर्ड ग्लीसनच्या पदार्पणाच्या सामन्यात विराट कोहलीला डेव्हिड मलाननं बाद केलं. विराट कोहलीनं सामान्य चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या वरच्या काठानं बॅकवर्ड पॉईंटवर पोहोचला जिथे तयार डेव्हिड मलानने कॅच करून विराटचा डाव संपवला. त्याला 3 चेंडूत केवळ एक धाव करता आली. किंग कोहलीचा फॉर्म आता हळूहळू बीसीसीआय (BCCI) आणि संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी कोहली मैदानात चमकेल अशी अपेक्षा असते, मात्र तसं होताना दिसत नाही.

कॅच पाहा

याआधी या मैदानावर खेळल्या गेलेल्या 50व्या कसोटीतील दोन्ही डाव फ्लॉप ठरले होते. एजबॅस्टन कसोटीत कोहलीला केवळ 11 आणि 20 धावा करता आल्या. हा सामना भारताने गमावला आणि मालिका जिंकण्याचे ऐतिहासिक स्वप्न अधुरे राहिले. तत्पूर्वी, जोश बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम फलंदाजी करून सामन्याला सुरुवात करेल. तीन सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने पहिला सामना 50 धावांनी जिंकला होता, जिथे भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने इंग्लंडला गोलंदाजी करताना फलंदाजीत 51 धावा आणि चार विकेट्ससह चमकदार कामगिरी केली होती.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.