IND vs WI: इंग्लंड सीरीज नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India West indies Tour) जाणार आहे. तिथे भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समिती सदस्यांनी रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, (Virat kohli) जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या दरम्यान विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी एक विधान केलं आहे. विराटला विश्रांतीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलय. विराट पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज नाहीय. विराट लवकरच जोरदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“मी समजू शकतो की, विराट कोहली बऱ्याच काळापासून मोठी इनिंग खेळलेला नाही. पण चांगल्या खेळाडूबरोबर असं घडतं. दुसऱ्याडावात तो ज्या चेंडूवर आऊट झाला, तो कुठल्याही फलंदाजासाठी कठीण चेंडू होता. विराट पूर्णपणे व्यवस्थित आहे. त्याला आराम देण्याची गरज नाही” असं त्याचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा ANI शी बोलताना म्हणाले.
“विराट कोहलीने आतापर्यंत टीम इंडियासाठी जे केलय, ते दुसरं कोणी करु शकलेलं नाही. तो जोरदार पुनरागमन करेल, यावर मला विश्वास आहे” असे राजकुमार शर्मा म्हणाले. विराट कोहली मागच्या दोन वर्षात 16 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 29.78 च्या सरासरीने 834 धावा केल्या आहेत. या दरम्यान विराटने एकही शतक झळकावलेलं नाही. विराटने फक्त 6 अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान 4 वेळा तो शुन्यावर आऊट झालाय.
शिखर धवन (कॅप्टन), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह,