AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन कॅप्टन, कोण IN, कोण OUT समजून घ्या…

IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनला या सीरीजसाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन कॅप्टन, कोण IN, कोण OUT समजून घ्या...
| Updated on: Jul 06, 2022 | 4:29 PM
Share

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) वनडे सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनला (Shikhar Dhawan) या मालिकेसाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने बुधवारी 6 जुलैला वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा केली. या सीरीजसाठी संघाच्या सीनियर आणि वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. कॅप्टन रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिलचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे.

शिखर धवन दुसऱ्यांदा कॅप्टन

डावखुरा फलंदाज शिखर धवनकडे दुसऱ्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. याआधी मागच्यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा तो कॅप्टन होता. त्यावेळी वनडे आणि टी 20 सीरीजमध्ये त्याने कॅप्टनशिप भुषवली होती. रवींद्र जाडेजाला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. तो पहिल्यांदाच ही जबाबदारी संभाळणार आहे. जाडेजाला याआधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण तिथे तो यशस्वी ठरला नाही.

संजू सॅमसन, अक्षर पटेल वनडे टीम मध्ये

संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना वनडे संघात स्थान मिळालय. त्याचवेळी शुभमन गिल आणि इशान किशन यांना सुद्धा संधी मिळाली आहे.

किती सामने होणार?

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ एकूण आठ सामने खेळणार आहे. या सीरीजसाठी पुन्हा एकदा खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार सुरु झाला होता. भारतीय संघाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता होती.

वेस्ट इंडिज दौरा कधी सुरु होणार?

भारताचा वेस्ट इंडिज दौरा 22 जुलैपासून सुरु होणार आहे. या सीरीज मध्ये भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. 7 ऑगस्टला हा दौरा समाप्त होईल. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार या दौऱ्यासाठी टीमची घोषणा आधीच होणार होती. पण निवड समिती काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायचा होता.

अशी आहे टीम

शिखर धवन (कॅप्टन), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह,

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत