AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, एलपीजी गॅसचा तुटवडा संपण्याचे संकेत, थेट इराण…

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतात मोठा फटका बसला आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. फक्त भारतच नाही तर जगातील अनेक देश संकटात आहेत. त्यामध्येच आता एलपीजी गॅसच्या तुटवड्यादरम्यान मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, एलपीजी गॅसचा तुटवडा संपण्याचे संकेत, थेट इराण...
LPG gas
| Updated on: Mar 11, 2026 | 9:56 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. मात्र युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. तणाव अधिक वाढताना दिसत आहे. इराणकडून होर्मुज समुद्री महामार्ग बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली. भारतात होर्मुज समुद्री महामार्गाच्या माध्यमातूनच गॅस आयात होतो. मात्र, हा महामार्ग बंद करण्यात आल्याने भारत संकटात सापडला. भारतात मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अस्थिर झाले. भारत या सर्व परिस्थितीमधून मार्ग काढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिकेत भयानक युद्ध सुरू असतानाच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. परराष्ट्र मंत्रायलयाने यावर बोलताना स्पष्ट केले की, दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर आणि जहाजांच्या सुरक्षेबद्दल चर्चा झाली.

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी होर्मुज आणि फारस खाडी येथील समुद्री सुरक्षेवर काही मुद्दे उपस्थित केले. सध्या या मार्गावर असुरक्षितता आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा थेट परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, इराणचे विदेश मंत्री अराघची यांच्यासोबत सध्याच्या संघर्षाच्या स्थितीवर चर्चा झाली.

आम्ही संपर्कात राहणार आहोत. मोजतबा खामेनेई यांना इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून जाहीर करण्याअगोदर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती. सध्याची परिस्थिती बघता होर्मुज महामार्ग भारताच्या टॅंकरसाठी इराण मोकळा करू शकतो.पुढील काही दिवस हा मार्ग बंद राहिला तर भारतात मोठे संकट येऊ शकते.

भारतात सध्याच गॅसचा मोठा तुडवटा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद करण्यात आली. त्यामध्येच जर अजून काही दिवस हा मार्ग बंद राहिला तर घरगुती सिलेंडर पुरवठा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारतासह अनेक देशांमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाचे संकट आहे. रशिया भारताला कच्चे तेल पुरवठा करत असल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलची कमी नाहीये.

Follow Us
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*