AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WAUS 3rd T20I Toss | ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉस जिंकला, आधी बॅटिंग कुणाची?

India Women vs Australia Women 3rd T20I Toss | 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न सामन्यासह मालिका जिंकण्याचा असणार आहे. तर टीम इंडिया सीरिज जिंकून वनडे सीरिजमधील पराभवाचा हिशोब क्लिअर करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

WIND vs WAUS 3rd T20I Toss | ऑस्ट्रेलिया पुन्हा टॉस जिंकला, आधी बॅटिंग कुणाची?
| Updated on: Jan 09, 2024 | 6:57 PM
Share

नवी मुंबई | वूमन्स क्रिकेट टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अंतिम टी 20 सामना आज 9 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.त त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन एलिसा हिली हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका ही सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना ही मालिका जिंकण्याची 50-50 टक्के संधी आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आमि टीम इंडिया दोन्ही संघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या तिसऱ्या सामन्यासाठी टीममध्ये कोणताही बदल केलला नाही. ऑस्ट्रेलियाने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियातही कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टीम न बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता टीम इंडियाचे खेळाडू कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवतात का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

कोण जिंकणार मालिका?

एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करतेय. एलिसाने आतापर्यंत एकूण 12 टी 20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. एलिसाने या 12 पैकी 7 सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकवलंय. तर 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही चमत्कार करुन मालिका जिंकून देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, मॅच जिंकणार?

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.