Video : युझवेंद्र चहलने कुलदीपची गच्ची (मान) पकडली, त्याला फलंदाजीला ढकललं, पाहा व्हिडिओ

| Updated on: Apr 23, 2022 | 5:45 PM

युझवेंद्र चहलने कुलदीपसोबत असे काही केले की त्यामुळे तो हसला आणि आश्चर्यचकित झाला. याची काल जोरदार चर्चाही रंगली.

Video : युझवेंद्र चहलने कुलदीपची गच्ची (मान) पकडली, त्याला फलंदाजीला ढकललं, पाहा व्हिडिओ
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात एक वाद निर्माण झाला.ओबेड मॅकॉयने शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फुल टॉस टाकला आणि रोव्हमन पॉवेलने षटकार ठोकला. हा चेंडू नाणेफेकीच्या पूर्ण कमरेच्या वरचा होता. त्यामुळे त्याला नो बॉल म्हणायला हवे, असं दिल्ली संघाने सांगितलं. पण मैदानावरील पंचांना ते जाणवलं नाही. दिल्लीच्या संघाने अनेक मागण्या केल्या यावेळी. पण पंचांनी त्यांचे एक ऐकले नाही. अशा स्थितीत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने दिल्लीचे फलंदाज पॉवेल-कुलदीप यादवला बोलवण्याचे संकेत दिले. पण यादरम्यान युझवेंद्र चहलने कुलदीपसोबत असे काही केले की त्यामुळे तो हसला आणि आश्चर्यचकित झाला. याची काल जोरदार चर्चाही रंगली.

युझवेंदर् चहल आणि कुलदीप यादव दीर्घकाळ टीम इंडियात एकत्र खेळले आहेत. ही जोडी कुल-चा या नावाने ओळखली जात होती. हे दोघे खूप चांगले मित्र असल्याचं बोललं जातं आणि दोघंही खूप धमाल करतात आणि विनोदही करतात. असेच दृष्य शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाले.

पंतने कुलदीपला बोलावलं आणि चहलने त्याला थांबवलं

पंचांच्या निर्णयाने पंत निराश झाला. तेव्हा त्याने पॉवेल आणि कुलदीपला बाहेर येण्याचे संकेत दिले. चहलने त्याला थांबवून क्रीजवर जाण्यास सांगितले. तेव्हा कुलदीप जात होता. तेव्हा कुलदीप थाबला आणि डगआऊटकडे बोट दाखवत चहलला काहीतरी बोलू लागला. चहलने डगआऊटकडे माग वळून पाहिलं. त्यानंतर कुलदीपकडे बघत काहीतरी बोलला. यादरम्यान कुलदीप जाऊ लागला. चहलने त्याला थांबवून त्याच्यासोबत चालण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याची मान धरून कुलदीपला क्रीझच्या दिशेने ढकलले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चहलने कुलदीपला धक्का दिला

दिल्लीकरांची निराशा

हा चेंडू नो बॉल घोषित करावा यासाठी दिल्लीने खूप प्रयत्न केले. पण मैदानावरील पंचांनी त्यपैकी एकाचंही ऐकलं नाही. दिल्लीने हा सामना पंधरा धावांनी गमावला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज होती. अशा परिस्थितीतही पॉवेलने सामन्यात उत्साह आणला होता. त्याने पहिला चेंडू सहा धावांसाठी पाठवला आणि दुसऱ्या चेंडूवरही षटकार मारला. त्याने तिसऱ्या चेंडूवर षटकारही मारला. तेव्हाच हा वाद झाला आणि तो शांत झाल्यावर पावेलने त्याची लय गमावली. त्याला पुन्हा मोठे फटके मारता आले नाहीत. हा चेंडू नो बॉल घोषित झाला असता तर दिल्लील विजयासाठी 3 चेंडूत सतरा धावा हव्या असत्या आणि पुढच्या चेंडूवर फ्री हिटही मिळाली असती.

इतर बातम्या

Meghalaya: मेघालय सरकारच्या प्रवेश बंदी विधेयकाला राज्यपाल मलिकांचा ब्रेक; म्हणाले, यावर संमती राष्ट्रपतींची घेणार

अजय देवगणच्या उपस्थितीत मेटावर्समध्ये रनवे 34 गेम लाँच, आता डिजीटल कलेक्टेबलची खरेदी करता येणार

Paint the Sky.. म्हणत शहनाज शेअर केले ‘खास’ फोटो