आमची इथे खेळायची लायकी नाही…पाकिस्तानी फलंदाजाने आपल्या संघाचे वाभाडे काढले, काय म्हणाला?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, पहिल्या डावात पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा एकामागोमाग कोसळली आणि संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानी संघात स्थान मिळवलेल्या सौद शकीलने संघाच्या निराशाजनक फलंदाजीच्या कामगिरीवर एक महत्त्वपूर्ण विधान केले.

पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना ९ सप्टेंबरपासून एडजबॅस्टन स्टेडियमवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या डावात १३३ धावांवर सर्वबाद झाला होता, तर यजमान इंग्लंडने ४ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या.
लॉर्ड्स कसोटीनंतर पाकिस्तानी संघात सात बदल करण्यात आल्याने, सर्वांचे लक्ष या तिसऱ्या सामन्यावर लागले होते. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीत कोणताही बदल दिसून आला नाही. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, त्यांचा पहिला डाव केवळ ३३.५ षटकांपर्यंतच टिकला.
एडजबॅस्टन कसोटीत पाकिस्तानी संघात स्थान मिळवलेल्या फलंदाज सौद शकीलने दिवसअखेरीस झालेल्या निराशाजनक फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त केली आणि संघ सातत्याने त्याच चुका करत असल्याचेही मान्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना शकील म्हणाला, "एक फलंदाजी युनिट म्हणून आम्ही त्याच चुका वारंवार करत आहोत, हे निराशाजनक आहे. मला वाटत नाही की हा आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. जर तुमच्यात या स्तरावर खेळण्याचा आत्मविश्वास नसेल, तर आमची इथे खेळायची लायकी नाही. पण कठीण परिस्थितीत, खराब फॉर्ममधून सावरणे आणखी कठीण होऊ शकते.
शकील म्हणाले की, "मी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आजूबाजूला विकेट्स पडत होत्या, त्यामुळे माझ्यासाठी शक्य तितक्या जास्त धावा करणे हा सर्वोत्तम पर्याय होता आणि म्हणूनच मी माझ्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार शक्य तितक्या वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होतो."