IPL 2022 POINTS TABLE : कोहलीच्या खराब कामगिरीमुळे चाहते नाराज, एका क्लिकवर पाहा आईपीएल पॉइंट्स टेबलमध्ये कोण आहे अव्वल

विराटचे टीम इंडियासाठी शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. विराटच्या चाहत्यांना त्याची मोठी खेळी पाहण्याची आस लागली आहे. प्रत्येक सामन्यात चाहते कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करत स्टेडियमवर जातात, पण त्याची निराशाच होते.

IPL 2022 POINTS TABLE : कोहलीच्या खराब कामगिरीमुळे चाहते नाराज, एका क्लिकवर पाहा आईपीएल पॉइंट्स टेबलमध्ये कोण आहे अव्वल
कोहलीच्या खराब कामगिरीमुळे चाहते नाराज
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 24, 2022 | 7:30 AM

मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) शनिवारी झालेल्या एकतर्फी आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला होता. पहिल्याच चेंडूवर कोहली पुन्हा एकदा ऑफ-स्टंपबाहेर बाद झाला. त्यामुळे आरसीबी केवळ 16.1 षटकात 68 धावांवर बाद झाला. आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासातली ही सहावी सगळ्यात कमी धावसंख्या आहे. हैदराबादला जिंकण्यासाठी फक्त आठ षटके लागली. अभिषेक शर्माने केन विल्यमसन (नाबाद 16) च्या साथीने 28 चेंडूत 47 धावा केल्या. या विजयाने हैदराबादला 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर नेले. तर अजूनही तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा खेळ एक वाईट स्वप्न म्हणून विसरायला हवा. कारण कालच्या सामन्यात सगळ्यांकडून खराब कामगिरी झाली आहे.

विराटच्या कामगिरीवरती चाहते नाराज

आयपीएल 2022 मध्ये आरसीबीला विराट कोहलीकडून खूप आशा होत्या. कर्णधारपद सोडल्यानंतर या मोसमात विराट फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल, असे सर्वांनाच वाटले होते, मात्र तसे काही घडले नाही. सलग दुसऱ्या सामन्यात विराट गोल्डन डकवर आऊट झाला. हैदराबादविरुद्ध फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट मैदानात आला आणि पहिल्याच चेंडूवर मार्को येन्सनने त्याला बाद केले. या मोसमात कोहलीच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. यापूर्वी लखनौविरुद्धच्या सामन्यातही विराटला खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे विराटचे चाहते अत्यंत नाराज आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठी खेळी खेळता आली नाही

विराटचे टीम इंडियासाठी शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. विराटच्या चाहत्यांना त्याची मोठी खेळी पाहण्याची आस लागली आहे. प्रत्येक सामन्यात चाहते कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करत स्टेडियमवर जातात, पण त्याची निराशाच होते.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक शतकं झळकावणाऱ्या या खेळाडूवर किती विश्वास व्यक्त करायचा, हे संघ व्यवस्थापन ठरवेल, पण गेल्या काही वर्षांपासून कोहलीची जादू फिकी पडली आहे, हे मात्र खरं.

Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ

Mega Block : आज मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर रेल्वेवरच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या कशी असेल लोकलसेवा

Amravati firing : अमरावतीत शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर गोळीबार! अज्ञातांनी योगेश गरड यांच्यावर झाडल्या गोळ्या