आमच्याकडून ती एक चूक घडली अन् …; क्लीन स्वीपनंतर कॅप्टन श्रेयस अय्यरने व्हिलनचा केला पर्दाफाश, रागाच्या भरात सगळं बोलून टाकलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिकेत भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली. संघाने 4-0 ने मालिका गमावली आणि त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आता प्रचंड भडकला आहे.

आमच्याकडून ती एक चूक घडली अन् ...; क्लीन स्वीपनंतर कॅप्टन श्रेयस अय्यरने व्हिलनचा केला पर्दाफाश, रागाच्या भरात सगळं बोलून टाकलं
shreyas iyer on team india
| Updated on: Jul 12, 2026 | 8:17 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका पार पडली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्यातही भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय संघाने 4-0ने मालिका गमावली. भारतीय संघावर अशी वेळ आल्याने सर्वांनाच राग अनावर झाला. केवळ तिलक वर्मा आणि इशान किशनने अर्धशतकी खेळी खेळली. इकर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आलेली नाही. आता भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका गमावल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरने आता एक महत्त्वपूर्ण विधान केले.

सामन्यानंतर भावूक झालेल्या कर्णधाराने उघडपणे कबूल केले की, “संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघ परिस्थितीशी जुळवून घेण्यात आणि योग्य रणनीती अवलंबण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. संघाला या मालिकेतून बरेच काही शिकायचे आहे. साउथॅम्पटनची खेळपट्टी आतापर्यंतच्या दौऱ्यातील सर्वोत्तम होती आणि आमच्या फलंदाजांनी पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन अवलंबला, परंतु अखेरीस निकाल आमच्या बाजूने लागला नाही. एक संघ म्हणून, परदेशी दौऱ्यांवर आम्हाला मैदानाशी आणि बदलत्या परिस्थितीशी लवकर जुळवून घ्यावे लागेल.”

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “या खेळपट्टीवर, जिथे फलंदाजांना अतिरिक्त मदत मिळत होती, तिथे आमच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यासाठी आपल्या रणनीतीत थोडा बदल करायला हवा होता. शिवाय, आम्ही काही महत्त्वाचे झेल सोडले, ज्यामुळे इंग्लंडला 257 धावांचा डोंगर उभा करता आला. जर ते झेल घेतले असते, तर आम्ही प्रतिस्पर्ध्यांना 220 ते 225 धावांवर रोखू शकलो असतो. अशा परिस्थितीत, टी-20 च्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय धावांचा पाठलाग करण्याची एक मोठी संधी आम्हाला मिळाली असती, पण दुर्दैवाने, आम्ही त्या संधीचा फायदा घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो.”

भारतीय कर्णधाराने फलंदाजीदरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांबद्दलही उघडपणे भाष्य केले. तो म्हणाला की, “258 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये नियमित अंतराने अनेक महत्त्वाच्या विकेट गमावल्या. अय्यरच्या मते, मोठ्या लक्ष्याच्या दबावाला बळी पडण्याऐवजी फलंदाजांनी क्रीजवर अधिक वेळ घालवून भागीदारी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. अशा मोठ्या सामन्यांमध्ये एका विशिष्ट गोलंदाजाला लक्ष्य करणे महत्त्वाचे असते, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्या घरच्या मैदानातील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी केली.”

अय्यर म्हणाला, “बटलर खरोखरच सनसनाटी फलंदाजी केली आणि त्यानंतर हॅरी ब्रूकने येऊन सामन्याची गती इंग्लंडच्या बाजूने वळवली. या शतकी भागीदारीने त्यांच्या खेळासाठी एक भक्कम पाया घातला. झेल घेऊन सामन्याची गती बदलण्याची संधी आम्हाला मिळाली असली तरी, हा आमच्या तरुण खेळाडूंसाठी एक उत्तम धडा आहे. मला खात्री आहे की भविष्यात जेव्हा हे खेळाडू पुन्हा येथे खेळायला येतील, तेव्हा ते या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतील.”

Follow Us