अजित आगरकर यांचे पद धोक्यात, बीसीसीआयकडून कठोर निर्णय, थेट मोठ्या बदलाची..
भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. बीसीसीआयकडून मोठा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांपासून संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक नाही. त्यातच आता बदल्याबद्दल माहिती मिळतंय.

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपत आहे. यादरम्यानच हालचालींना वेग आला. मोठे फेरबदलाचे संकेत आहेत. सप्टेंबर महिन्यात अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपत आहे. कार्यकाळ संपत असला तरीही त्यांना आता मुदत मिळणार नसल्याचे कळतंय. आगरकर यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवला जाणार नाही. तीन महिन्यांसाठी अजित आगरकर यांचा कार्यकाळ बीसीसीआयने वाढवला होता. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात करार संपणार आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की, अखेर अजित आगरकर यांची जागा नक्की कोण घेणार? मिळालेल्या माहितीनुसार, याकरिता पर्यायही बीसीसीआयला मिळाला आहे. एका मोठ्या चेहऱ्याकडे ही जबाबदारी दिली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे माजी दिग्गज फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली जाणार आहे. आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 मध्ये संपणार होता. बीसीसीआयने त्यांचा करार तीन महिन्यांकरिता पुढे ढकलला. 2027 च्या विश्वचषकापर्यंत आणखी त्यांचा कार्यकाळ वाढवणार असल्याची चर्चा होती.
पण आता येणाऱ्या माहितीनुसार, ही शक्यता आता कमी आहे. आता ही जबाबदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यावर असणार आहे. अजित आगरकर यांच्या निवड समितीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या कामगिरीचा विचार केला असता संघाने ती प्रमुख स्पर्धा आपल्या नावावर केल्या. टी 20, एक चॅम्पियन्स ट्रॉफीचा यात समावेश आहे. मात्र, असे असले तरीही आता अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढणार नाही. अजित आगकर यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्याचा विचार बीसीसीआयने सोडून दिला.
रिपोर्टनुसार, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याकडे ही धुरा असणार आहे. याबाबत अजून घोषणा होणे बाकी आहे. मात्र, बीसीसीआकडून व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळतंय. पुढील काही दिवसात महत्वाचे सामने होणार आहेत. ज्यामुळे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यावर महत्वाची जबाबदारी असेल. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी म्हणावी तशी चांगली राहिली नाहीत. कसोटी, वन डे आणि टी20 मध्ये संघ समाधारकारक कामगिरी करू शकला नाही.