अफगाणिस्ताननंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही विराट बाहेर पडणार? दुखापतीबाबत अपडेट समोर

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली लवकरच टीम इंडियासाठी मैदानावर परतताना दिसणार आहे. त्याच्या दुखापतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

अफगाणिस्ताननंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही विराट बाहेर पडणार? दुखापतीबाबत अपडेट समोर
virat kohli
| Updated on: Jun 19, 2026 | 3:08 PM

भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. दोन सामने पार पडले असून दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने अभेद्य आघाडी घेतली आहे. यानंतर इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ मालिका खेळणार आहे. आता अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तर विराट कोहली खेळला नव्हता. कोहली आता मैदानात कधी परतणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोहली संघात कधी परतणार आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली या मालिकेत खेळत नाहीये. दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, त्याच्या दुखापतीबद्दल आणि टीम इंडियामध्ये त्याच्या पुनरागमनाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, विराट कोहली वेगाने बरा होत आहे आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो.

आरसीबीकडून खेळताना आयपीएलच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीला दुखापत झाली होती. त्याने अंतिम सामन्यात संघासाठी एक शानदार सामना जिंकून देणारी खेळी केली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु नंतर दुखापतीमुळे त्याला बाहेर काढण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याचे पुनरागमन ही टीम इंडिया आणि तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ पुढील 3-4 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.  शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकामुळे ही मालिका अधिकच विशेष ठरते.

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, विराट कोहली आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळतो. तो शेवटचा जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळला होता, जिथे त्याने 80 च्या सरासरीने आणि 105.26 च्या स्ट्राइक रेटने 240 धावा करून भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

Follow Us