AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 58 वर्षांचे लग्न रद्द करण्यास न्यायालयाचा नकार, कारण ऐकून सर्वच थक्क

हायकोर्टाचा मोठा निर्णय. राजस्थानमधील 58 वर्षांच्या लग्नाला घटस्फोट देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. कारण वाचून अनेकांना बसला आहे धक्का.

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 58 वर्षांचे लग्न रद्द करण्यास न्यायालयाचा नकार, कारण ऐकून सर्वच थक्क
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 14, 2026 | 4:24 PM
Share

Rajasthan : राजस्थान उच्च न्यायालयाने 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या दांपत्याच्या 58 वर्षे जुन्या विवाहबंधनाला तडा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती सुदेश बंसल आणि न्यायमूर्ती अनिल कुमार उपमन यांच्या खंडपीठाने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पतीने दाखल केलेली अपील फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

न्यायालयाने स्पष्ट केले की वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद, वाद-विवाद आणि चढ-उतार हे स्वाभाविक असतात. मात्र अशा सामान्य घटनांना ‘क्रूरता’ म्हणून दाखवत घटस्फोटाचा आधार बनवणे योग्य नाही. विशेषतः या वयात घटस्फोट मंजूर केल्यास केवळ पत्नीच नाही तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. समाजातील सर्व सदस्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचू शकतो असेही न्यायालयाने नमूद केले.

पतीचा आरोप काय?

सदर दांपत्याचा विवाह 29 जून 1967 रोजी झाला होता. 2013 पर्यंत त्यांनी तब्बल 46 वर्षे कोणतीही तक्रार नोंदवता एकत्र संसार केल्याचे पतीने स्वतः 26 मे २०१४ रोजी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत मान्य केले होते. न्यायालयाने निरीक्षण केले की इतका दीर्घ कालावधी एकत्र राहिल्यानंतर आणि वाढत्या वयानुसार मानसिक परिपक्वता व सहनशीलता वाढलेली असते. सुरुवातीच्या अडचणी कालांतराने परस्पर समजुतीने सोडवता येतात.

पतीने दावा केला की 2014 मध्ये पत्नीने त्यांच्याविरुद्ध खोटी हुंडाबळीची एफआयआर दाखल केली होती. जी पोलिसांनी चौकशीनंतर खोटी ठरवून बंद केली. त्यामुळे त्यांना सामाजिक अपमान सहन करावा लागला. तसेच पत्नी सर्व स्थावर मालमत्ता फक्त मोठ्या मुलाच्या नावावर करायला इच्छुक असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतः मात्र दोन्ही मुलांमध्ये समान वाटणी व्हावी अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नी मोठ्या मुलाच्या प्रभावाखाली असून त्यांची काळजी घेत नाही तसेच इतर महिलांशी संबंध असल्याचे खोटे आरोप करते असेही त्यांनी म्हटले.

पत्नीची बाजू

पत्नीने मात्र पतीवर गंभीर आरोप केले. पती कुटुंबीय मालमत्ता विक्री किंवा वाटप करून वाया घालवण्याच्या तयारीत असल्याचे तिने सांगितले. त्यास विरोध केल्यावर पतीने लहान भावाच्या प्रभावाखाली येत घटस्फोटाची याचिका दाखल केली असा दावा तिने केला.

तसेच पतीचे इतर महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोपही तिने केला. एका महिलेचा घरात प्रवेश करून तिला खोलीत ठेवण्यात आल्याची घटना घडल्याचेही तिने नमूद केले. संबंधित मालमत्ता स्वतःने खरेदी केलेली असल्यानेच तिला एफआयआर दाखल करावी लागली असेही पत्नीने स्पष्ट केले.

न्यायालयाचे निरीक्षण

उच्च न्यायालयाने नमूद केले की मालमत्तेच्या वादामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र केवळ त्या कारणावरून इतक्या वयस्क दांपत्याचा विवाह मोडणे योग्य नाही. पोलिसांनी हुंडाबळीची एफआयआर खोटी ठरवली असली तरी घरात इतर महिला असल्याच्या घटनेला पूर्णपणे असत्य ठरवलेले नाही असेही न्यायालयाने निरीक्षणात घेतले.

Follow Us
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद