“ना मोबाईलचं वेड, ना सेल्फी आवड, अशी ‘गॅझेट फ्री’ आई लाभलेली आपली शेवटची भाग्यवान पिढी”, आयएएस अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांचं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे.

ना मोबाईलचं वेड, ना सेल्फी आवड, अशी गॅझेट फ्री आई लाभलेली आपली शेवटची भाग्यवान पिढी, आयएएस अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल
| Updated on: May 17, 2022 | 5:15 PM

मुंबई : आईसाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. त्याबद्दल अनेकजण उघडपणे आपल्या भावना व्यक्त करतात. तर काहीजण तो हळवा कोपरा कायम आपल्या मनात जपतात. असंच आईविषयी बोलणारं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. हे पत्र आहे, आयएएस अधिकारी अर्पित वर्मा (IAS Arpit Verma) यांचं. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय (Viral Latter) बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे. त्यांनी लिहिलंय की ज्यांची आई मोबाईल वापरत नाही, अश्या शेवटच्या पिढीचे आपण सदस्य आहोत. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला अशी ‘गॅझेट फ्री’ आई (Gadget free Mother) मिळाली आहे.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांचं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे. त्यांनी लिहिलंय की ज्यांची आई मोबाईल वापरत नाही, अश्या शेवटच्या पिढीचे आपण सदस्य आहोत. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला अशी ‘गॅझेट फ्री’ आई मिळाली आहे.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आईबद्दल हृदयस्पर्शी ओळी लिहिल्या आहेत. या पत्रावर लिहिलं आहे की, “आमची ही शेवटची पिढी आहे, ज्याच्याकडे अशी मायाळू आई आहे. ना तिचं कोणत्या सोशल मीडियावर अकाऊंट आहे, ना तिला सेल्फी घेण्याची आवड आहे. तिला तर हे देखील नाही माहित की स्मार्टफोनचं लॉक कसं उघडलं जातं. तिला तिची जन्मतारीखही नाही माहित. जिने खूप कमी सुखसुविधांमध्या आपलं जीवन जगलं आहे, तेही कुठलीही तक्रार न करता. होय मी त्या पिढीचा सदस्य आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे.”, या पत्राची आणि या मजकुराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अर्पित यांच्या या ट्विटला साडे आठ हजार लोकांनी लाईक केलंय. तर एक हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलंय.