लव्ह मॅरेज केलं की मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा! प्रेमात पडल्यावर थेट… अजब नियमाने खळबळ

भारतात एक गाव असे आहे जिथे लव्ह मॅरेज करण्यास पूर्णपणे मनाई आहे. जर एखाद्या कुटुंबातील मुलाने किंवा मुलीने पळून जाऊन लग्न केले तर त्यांना होणारी शिक्षा ही भयानक आहे.

लव्ह मॅरेज केलं की मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा! प्रेमात पडल्यावर थेट... अजब नियमाने खळबळ
Love Marriage
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 27, 2026 | 5:33 PM

कायद्याने प्रौढ व्यक्तीला आपल्या पसंतीने लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण देशाच्या अनेक भागांत आजही प्रेम-विवाह करणाऱ्या युवक-युवतींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक छळ आणि त्रास सहन करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. येथे प्रेम-विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार घालण्याची खुलेआम घोषणा करण्यात आली आहे.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गावातील मोठ्या संख्येने ग्रामीण एकत्र जमलेले दिसत आहेत. त्यांच्यामध्ये एक युवक गावाच्या वतीने कथित ‘फरमान’ वाचताना ऐकू येतो. व्हिडीओमध्ये तो युवक घोषणा करतो की, संपूर्ण पंचेवा गावाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे की, गावातील कोणताही मुलगा किंवा मुलगी पळून जाऊन (लव्ह मॅरेज) लग्न करेल, तर त्याच्यासोबतच त्याच्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक निर्बंध लादले जातील. अशा कुटुंबांवर पूर्ण सामाजिक बहिष्कार घातला जाईल. त्यांना कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही.

काय आहे शिक्षा?

घोषणेनुसार, अशा कुटुंबांना कोणीही मजुरीसाठी कामावर बोलावणार नाही. जर कोणी अशा प्रतिबंधित कुटुंबाला मजुरीसाठी बोलावले तर त्याच्यावरही सामाजिक निर्बंध लादले जातील. याशिवाय, पळून लग्न केलेल्या कुटुंबांना दूध किंवा इतर कोणतीही वस्तू देणे-घेणे बंद राहील. फरमानमध्ये हेही सांगण्यात आले आहे की, अशा कुटुंबांची शेती कोणीही भाड्याने घेणार नाही आणि त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारचे काम करणेही बंद राहील. इतकेच नाही, तर प्रेम-विवाह करणाऱ्यांना मदत करणारे किंवा त्यांचे साक्षीदार गावकरी असतील तर त्यांच्यावरही सामाजिक बहिष्कार लादला जाईल. बाहेरील व्यक्तीने असे लग्न घडवले तर त्याला आश्रय देणाऱ्या गावकऱ्यांवरही बहिष्काराची कारवाई होईल.

कुठे आहे ते गाव?

व्हिडीओमध्ये प्रेम-विवाह केलेल्या तीन कुटुंबांच्या प्रमुखांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, बहिष्कृत कुटुंबांना कोणीही साथ दिली तर त्यांच्या कुटुंबावरही सामाजिक निर्बंध लादले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण गंभीर झाले आहे. भारतीय संविधान आणि कायद्याने प्रेम-विवाहाला परवानगी दिलेली असतानाही, गावपातळीवर असे फरमान काढणे हे सामाजिक मानसिकता आणि कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करत आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील पंचेवा गावात घडला आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे.