पाहा रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेली ‘जनगणमन’ राष्ट्रगीताची प्रत, नोबेल पॅनलने केली शेअर

रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणारे ते पहिले गैर-यूरोपीय आणि पहीले कवी साहित्यिक होते. 

पाहा रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेली जनगणमन राष्ट्रगीताची प्रत, नोबेल पॅनलने केली शेअर
Rabindranath Tagor
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 15, 2024 | 8:54 PM

भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. देशभरात हा क्षण साजरा केला जात आहे.या दरम्यान ‘जनमगणमन’ राष्ट्रगीत ज्यांनी रचले ते थोर साहित्यिक नोबेल पुरस्कार विजेते कवी आणि कलाकार रवींद्रनाथ टागोर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नोबेल पुरस्कार पॅनल रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेल्या जनगणमन या राष्ट्रगीताची लिखित प्रत आज समाजमाध्यमावर शेअर केली आहे. नोबेल पॅनलने या इंग्रजी लिपीचा एक्सवर अनुवाद देखील शेअर केला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे सुवर्ण क्षण समाजमाध्यमात व्हायरल झाले आहेत.

शब्दांवर प्रभुत्व असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्य प्रतिभेला टक्कर देणारा कोणीच नाही हे गीत त्याचे उदाहरण आहे. डिसेंबर 1911 रोजी मूळ बंगाली भाषेत त्यांनी ‘भरोतो भाग्यो बिधाता’ या शब्दात त्यांनी या काव्याचा पहिला छंद लिहिला आहेत. जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधानाने राष्ट्रगीत म्हणून या कवितेची निवड केली आहे. ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी ते मूळ बंगाली भाषेत लिहीले होते. या गीताला 1913 मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. आज स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त हे गीत शेअर करण्यात आले होते.

काय आहे इतिहास

‘भरोतो भाग्यो बिधाता’या कविता सदृश्य गीताला इंग्रजी अनुवाद ‘द मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया’ असे रवीन्द्रनाथ टागोर यांनी हस्त लिखितात लिहीलेले या पोस्टमध्ये दिसत आहे. ‘जन गण मन’ चे भाषांतर ‘आपण सर्व लोकांच्या मनाचे शासक’ आहात, अशा रूपात केलेले दिसत आहे.

येथे पाहा ट्वीटरची पोस्ट –

सकाळी 11.42 वाजात नोबेल पुरस्कारच्या  (आधी ट्वीटरवर ) ‘एक्स’ अकाऊंटवर ही पोस्ट झाल्यानंतर या पोस्टला सुमारे 1 लाख 66 हजार लोकांनी पाहीले आहे, बातमी लिहीपर्यंत या पोस्टला 1200 वेळा रीट्वीट केले गेले आहे. सुमारे 5000 यूजर्सनी या लाईक केले आहे.

रवीन्द्रनाथ टागोर एक कवी, गीतकार, लेखक, चित्रकार, नाटककार, संगीतकार आणि थोर समाज सुधारक होते. ज्यांनी बंगाली साहित्य आणि संगीतला जगभर नेले.

Follow Us