AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात आता मोठा बदल..रोज थांबावे लागेल अर्धा तास जास्त..कारण काय?

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आता वाढणार आहे..

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात आता मोठा बदल..रोज थांबावे लागेल अर्धा तास जास्त..कारण काय?
कामाचे तास वाढणारImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 27, 2022 | 5:07 PM
Share

नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Employees) रोजच्या तासात आता बदल होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात (Working Hour) बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना रोज अर्धा तास (Half Hour) अधिक थांबावे लागणार आहे. त्यामागे कर्मचाऱ्यांचा फायदा आहे..

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (All India Bank Employees Association) इंडियन बँक असोसिएशनला एक पत्र पाठविले आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढविण्याचा मुद्दा समोर आला आहे.

कर्मचारी आठवड्यातील दोन दिवस सुट्टी मिळण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर कामाच्या वेळापत्रकात बदल करत प्रत्येक दिवशी 30 मिनिटे त्यांना अधिक काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी ही त्यासाठी होकार भरला आहे.

या नवीन प्रस्तावानुसार, कर्मचाऱ्यांना आता सध्याच्या वेळेपूर्वी बँकेत अर्धा तास अगोदर हजर रहावे लागेल. तसेच कस्टमर केअर सर्व्हिस अथवा नॉन कॅश ट्रॉन्झक्शनसाठी प्रत्येक दिवशी अतिरिक्त 30 मिनिटे अधिक द्यावे लागतील.

या योजनेनुसार, बँका आता सकाळी 9.45 ऐवजी 9.15 वाजता सुरु होणार आहेत. तर बँक बंद होण्याची वेळ आता 4.45 अशी असेल. या काळात बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहकांना आता सकाळी लवकर बँकेतील व्यवहार पूर्ण करता येतील.

भारतीय बँक संघाने अद्याप या निर्णयाला मंजुरी दिली नाही. परंतु, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

प्रश्न शनिवारच्या कामाचा आहे. महिन्यातील दोन शनिवार बँका बंद असतात. तर दोन शनिवार कामकाज सुरु असते. त्यादिवशीचा मुद्दा सोडविण्यात आला तर लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ बदलणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.