‘त्यांना’ ‘कायदा आणि व्यवस्थे’चं काही नाही; फडणवीस यांच्यावर कोणाची सडकून टीका
या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमूळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये.
मुंबई : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमूळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये. याप्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. त्यांनी, अकोल्याच्या घटनेवर मी काय बोलणार? त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी बोलायला हवं. या राज्याला जर गृहमंत्री असतील आणि राजकारणातून त्यांना उसंत मिळत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात ते विचार करतील. पण मला तसं वाटतं नाही की राज्याच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काही आस्था आहे. ते 24 तास फक्त राजकारणात व्यस्त असतात.
Published on: May 15, 2023 11:22 AM
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
