जालन्याच्या अंतरवालीतील ‘त्या’ घटनेवरून तिघांना अटक, जरांगे पाटील यांचा हल्लाबोल काय?
पुराव्याच्या आधारे अंबड पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर गुन्हे मागे घेणार होतात मात्र आता अटक सुरू झाली, सरकारचा नेमका कोणता डाव? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील दगडफेक प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुराव्याच्या आधारे अंबड पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर गुन्हे मागे घेणार होतात मात्र आता अटक सुरू झाली, सरकारचा नेमका कोणता डाव? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. या प्रकरणात आरोपी ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसाट आणि कैलास सुखसे अशी या तिघांची नावं असून त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे अशी कलमं लावण्यात आली आहेत. ऋषिकेश बेदरे या आरोपीकडून अंबड पोलिसांनी जीवंत काडतूसं आणि गावठी पिस्तुल जप्त केली आहे. याप्रकरणावर काय केलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य?
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

