आंबोली घाटातील धबधब्याचं रौद्ररुप तुम्ही पाहिलं का?, रस्त्याची झाली नदी अन्…
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच सिंधुदुर्गातील कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात मोठ्या प्रवाहाने धबधबे कोसळताना दिसताय. इतकंच नाहीतर आंबोली घाटातील धबधब्यानी रौद्ररूप धारण केल्याचे चित्र समोर आलं आहे
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच सिंधुदुर्गातील कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात मोठ्या प्रवाहाने धबधबे कोसळताना दिसताय. इतकंच नाहीतर आंबोली घाटातील धबधब्यानी रौद्ररूप धारण केल्याचे चित्र समोर आलं आहे. आंबोली घाटात ठिकठिकाणी ओसंडून धबधबे वाहत असून आंबोली घाटातील रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त केल्याचं चित्र दिसत आहे. तुम्ही देखील रौद्ररूप धारण केलेल्या धबधब्याचा व्हिडीओ पाहिल्यास तुमच्या मनात देखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे, अनिर्बंधीत पर्यटनावर चाप लावण्याच्या दृष्टिने कडक निर्बंध वन विभागाकडून लागू करण्यात आले आहेत. आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांनी जर कचरा केला किंवा माकडांना खायला घातलं तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना आता घाट व धबधबा परीसरात स्वच्छता राखण्यास बंधनकारक आहे. सावंतवाडी वनविभागाकडून आंबोली घाटात कचरा टाकणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

