केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न- वर्षा गायकवाड
सोनिया गांधी यांनी ईडीची नोटीस दिल्याच्या निषेधार्थ ककोंग्रेसने आज देशव्यापी मोर्चा काढला. मुंबई येथे निघालेल्या मोर्चामध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सरकार जीएसटी, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विषयावर काहीच बोलत नाही, महागाईमुळे सर्वसामान्यांचे […]
सोनिया गांधी यांनी ईडीची नोटीस दिल्याच्या निषेधार्थ ककोंग्रेसने आज देशव्यापी मोर्चा काढला. मुंबई येथे निघालेल्या मोर्चामध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सरकार जीएसटी, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विषयावर काहीच बोलत नाही, महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे गायकवाड म्हणाल्या. गेल्या सात वर्षात कुठलीच नोटीस पाठविली नाही मग आताच आठवण कशी झाली असा प्रश्नही त्यांनी विचारला. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
