केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न- वर्षा गायकवाड
सोनिया गांधी यांनी ईडीची नोटीस दिल्याच्या निषेधार्थ ककोंग्रेसने आज देशव्यापी मोर्चा काढला. मुंबई येथे निघालेल्या मोर्चामध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सरकार जीएसटी, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विषयावर काहीच बोलत नाही, महागाईमुळे सर्वसामान्यांचे […]
सोनिया गांधी यांनी ईडीची नोटीस दिल्याच्या निषेधार्थ ककोंग्रेसने आज देशव्यापी मोर्चा काढला. मुंबई येथे निघालेल्या मोर्चामध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सरकार जीएसटी, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विषयावर काहीच बोलत नाही, महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे गायकवाड म्हणाल्या. गेल्या सात वर्षात कुठलीच नोटीस पाठविली नाही मग आताच आठवण कशी झाली असा प्रश्नही त्यांनी विचारला. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........