AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही पुलावरून नदीत उडी मारून जीव द्यावा का?, ठाकरेंच्या दौऱ्याआधी शेतकऱ्याचा टाहो...

मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही पुलावरून नदीत उडी मारून जीव द्यावा का?, ठाकरेंच्या दौऱ्याआधी शेतकऱ्याचा टाहो…

| Updated on: Oct 23, 2022 | 1:36 PM
Share

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहा...

औरंगाबाद : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. हाता-तोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय. अशात उद्धव ठाकरे औरंगाबादचा दौरा करत आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्रीसाहेब पावसाने आमचा सोन्याचा घास हिरावलाय.आम्ही पुलावरून नदीत उडी मारून जीव द्यावा का?, असा सवाल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना (CM Eknath Shinde) सवाल विचारला आहे.

Published on: Oct 23, 2022 01:35 PM