Maharashtra Local Body Polls: शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द… कोर्टानं आयोगाला सुनावलं अन् अशी केली कानउघडणी
औरंगाबाद खंडपीठाने शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द केल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला सुनावले आहे, आयोगाच्या "सावळ्या गोंधळा"वर ताशेरे ओढले. चुका टाळण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
औरंगाबाद खंडपीठाने शेवटच्या क्षणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रद्द केल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाची कानउघडणी केली आहे. खंडपीठाने आयोगाच्या सावळ्या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा चुका टाळण्यासाठी आयोगाने तातडीने मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन्स) तयार करावीत, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
न्यायालयाने म्हटले आहे की, 21 डिसेंबरपर्यंत एक्झिट पोल जाहीर करता येणार नाहीत. तसेच, मतमोजणी एकत्रित करून निकाल एकत्र जाहीर करण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. या निर्देशांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर अधिक भर दिला गेला आहे. राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू असतानाच, काही ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमुळे निवडणुकीतील तणावपूर्ण वातावरण अधोरेखित झाले आहे.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

