अजित पवार गटाच्या टीकेवर आव्हाड याचं अजित पवार यांना आव्हान; म्हणाले, ‘…तर राजकारण सोडून’
इतकेच नाही तर त्यांनी थेट भाजप-शिंदे सरकारमध्ये प्रवेश करत मंत्री पदाचती देखील शपथ घेतली आहे. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर टीका सुरू झाली आहे.
मुंबई : अजित पवार यांनी आपल्या सोबत 40 एक आमदार नेत राष्ट्रवादीला सुंरूग लावण्याचे काम केलंय. इतकेच नाही तर त्यांनी थेट भाजप-शिंदे सरकारमध्ये प्रवेश करत मंत्री पदाचती देखील शपथ घेतली आहे. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. याचदरम्यान अजित पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत बडव्यांनी शरद पवार यांना घेरल्याचं म्हटलं होतं. त्यावरून आव्हाड यांनी अजित पवार यांना भावनिक आव्हान केलं आहे. त्यांनी, तर अजित पवार गट, आम्हा दोन-चार जणांमुळे हे जर बाहेर पडले असतील तर त्यांनी परत यावं आम्हाला काही नको. मी राजकारण सोडून जातो. जाताना मी माझ्यासोबत जयंत पाटलांना देखील घेऊन जातो असे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला

