Bacchu Kadu : …त्यांच्या बापाला करावंच लागेल, आंदोलन स्थगित का केलं? रमेश पाटलांचा बच्चू कडूंना फोन, काय झाला संवाद?
कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी भाजप आणि सरकारमधील काही लोकांवर बदनामीचा अजेंडा राबवण्याचा आरोप केला आहे. 30 जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास राज्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही कडू यांनी दिला. रमेश पाटील यांच्या प्रश्नांना उत्तर देताना कडू यांनी पावसाचे कारण देत आंदोलन मागे घेतल्याचे स्पष्ट केले.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन स्थगित केल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्यावरील टीकेला पत्रकार परिषदेत उत्तर दिले. भाजप आणि सरकारमधील काही लोक त्यांची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसह केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेतल्याचे कडू यांनी सांगितले. मात्र, आता कर्जमाफी न झाल्यास महाराष्ट्रात “हंगामा” होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी बच्चू कडू यांना फोन करून आंदोलनाबाबत प्रश्न विचारले होते. कडू यांनी आपल्या आंदोलनाला पाऊस हे देखील स्थगितीचे एक प्रमुख कारण असल्याचे म्हटले. पावसामुळे आंदोलनस्थळी आंदोलकांची संख्या कमी झाली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी न झाल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला मतदान करू नका, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. या ऑडिओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
Published on: Nov 02, 2025 06:51 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
