बारसूत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांचा अपघात; गाडी उलटली, 17 पोलीस जखमी
राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत. तर विरोध पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तसाठी जाणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील बारसू रिफायनरीसाठी आज सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या सर्व्हेला आजपासून सुरूवात होणार असून रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत. तर विरोध पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तसाठी जाणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर हा अपघात कशेडी गावाजवळ झाला. तर येथील कशेळी बांध येथे एका वळणावर गाडी थेट खाली पडल्याने हा अपघात झाला.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...

