bhagat Singh Koshyari Statement: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा निषेध
'गुजराती आणि राजस्थानी लोकं महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्रात काय राहील?' असे विधान राज्यपालांनी एका कार्यक्रमात केले. यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी महाराष्ट्रीयन लोकांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोकं गुण्या गोविंदाने एकत्र राहतात, मात्र त्यात मिठाचा खडा टाकून कटुता वाढवत राहायची असे म्हणत रुप्रिय सुळे यांनी राज्यपालांवर ताशेरे ओढले. ‘गुजराती आणि राजस्थानी लोकं महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्रात काय राहील?’ असे विधान राज्यपालांनी एका कार्यक्रमात केले. यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राज्यपालाच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
