AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल अन्..., भाजप नेत्याचा राज-उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल अन्…, भाजप नेत्याचा राज-उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

| Updated on: Dec 19, 2025 | 3:19 PM
Share

१६ जानेवारीला ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे आणि संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल, असे भाकीत केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राजकीय भवितव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १६ जानेवारीला ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपेल, असे विधान करून या चर्चेला धार आणली आहे. सोमय्या यांनी “दोन्ही ठाकरे बंधूंना आता कळले आहे की, १६ जानेवारीला त्यांच्या दोन्ही गटांचे अस्तित्व समाप्त होणार आहे,” असे म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटावर कोविड काळात मुंबईकरांना २ हजार कोटी रुपये लुटल्याचा आणि माफिया कॉन्ट्रॅक्टरने लुटलेल्या रकमेतून कमिशन मिळाल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

दरम्यान, भाजपचे आणखी एक नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही “शेवटची निवडणूक” असेल, असे भाकीत केले आहे. त्यांच्या मते, या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत आणि ते आपल्या सोयीने दुसऱ्या पक्षांमध्ये जातील. दानवे यांनी भारतीय जनता पक्षाची संगत सोडून हिंदुत्वाला रामराम ठोकल्यानंतर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यापासूनच ठाकरे गटाचा पक्ष संपुष्टात येत असल्याचे म्हटले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Published on: Dec 19, 2025 03:19 PM