AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जत्रेचा अनुभव त्यांना यात्राही जत्राच वाटणार, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

जत्रेचा अनुभव त्यांना यात्राही जत्राच वाटणार, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 12:52 PM
Share

ज्या़ंना जत्रेचा अनुभव आहे. त्यांना दुसरं काय दिसणार, जनआशीर्वाद यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय त्यामुळे सत्ताधारी हालले आहेत असा टोला लगावला.शिवस्मारकाबाबत या सरकारने दोन वर्षात काही केलं नाही. सरकारने हे गांभीर्याने घ्यायला हवे. सुप्रीम कोर्टात एक स्थगिती आहे ती उठवायला हवी, असंही ते म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभावली आहे, असं म्हटलं. अनेकांनी पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून घोषीत करावं अशी विनंती केली होती. इतर राज्यांत पत्रकारांना तो दर्जा देण्यात आला महाराष्ट्रात तो देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडायला व्यासपीठ नाही. काही अधिकारी स्पेशल पोस्टिंगने आलेलं आहेत. मंत्रालय येथील शेतकऱ्याची आत्महत्या ही दुर्दैवील आहे. किमान मृत्यूनंतर तरी शेतकऱ्याचं म्हणनं सरकारने ऐकावं. हे सरकार चुकून आलेलं आहे. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपीला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे. जनआशीर्वाद यात्रेवर शिवसेनेनं जत्रा अशी टीका केल होती. त्यावर फडणवसीस यांनी ज्या़ंना जत्रेचा अनुभव आहे. त्यांना दुसरं काय दिसणार, जनआशीर्वाद यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय त्यामुळे सत्ताधारी हालले आहेत असा टोला लगावला.शिवस्मारकाबाबत या सरकारने दोन वर्षात काही केलं नाही. सरकारने हे गांभीर्याने घ्यायला हवे. सुप्रीम कोर्टात एक स्थगिती आहे ती उठवायला हवी, असंही ते म्हणाले