AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियम फक्त जनतेला, सरकारमधील मुख्यमंत्री-आमदारांच्या कार्यक्रमाला नाही – Atul Bhatkhalkar

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई आणि नागपूर दोन्ही विधिमंडळात सोशल डिस्टन्सिंग पाळून बसण्याची आसनव्यवस्था आहे. मात्र, या सरकारला केवळ पळ काढायचा आहे, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन केवळ 5 दिवसांचं असणार आहे. तसंच हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. शिवाय मार्चमध्ये विशेष बाब म्हणून नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आणि अधिवेशन हा योगायोग आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन पूर्ण वेळ सुरु आहे. त्यामुळे या सरकारला पूर्णकाळ अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नव्हती. मुंबई आणि नागपूर दोन्ही विधिमंडळात सोशल डिस्टन्सिंग पाळून बसण्याची आसनव्यवस्था आहे. मात्र, या सरकारला केवळ पळ काढायचा आहे, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.