लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऐन ऑफिसहुन परतीच्या वेळीच मोठी घडोमोड घडली आहे.
सीएसएमटी-कल्याण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेवरील आंबिवली आणि टिटवाळा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या तांत्रिक बिघाडाचा फटका अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 30 मिनिटांपासून उपनगरीय लोकल सेवा उशिराने धावत आहेत. तर 40 ते 45 मिनिटांपासून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल सेवांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Published on: Jun 06, 2026 05:47 PM
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय

